शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ramcharitmanas Row: रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:27 IST

Ramcharitmanas Bageshwar Sarkar : रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे.

रामचरितमानसच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशात वादाला तोंड फुटले आहे. अनेक ठिकाणांवरून पवित्र रामचरितमानसाच्या प्रती जाळल्याचे आणि फाडल्याचे वृत्त आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. आता बागेश्वर सरकार अर्थात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदूंच्य या पवित्र ग्रंथावरू सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया देली आहे.

रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे. यामुळे आता प्रत्येक हिंदू जागृत होण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर ज्या लोकांनी रामचरितमानसचा अपमान केला, अशा लोकांसोबत संबंध ठेवायचे की नाही, त्यांच्यासंदर्भात तुम्हाला स्वत:लाच विचार करावा लागेल, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

बागेश्वर सरकारने म्हटले आहे की, रामचरितमानसचा अपमान करणाऱ्यांनी भारत सोडायला हवा. या लोकांनी भारतात राहू नये. रामचरितमानसचा अपमान करून या लोकांनी भारतात राहण्याचा अधिकार गमावला आहे. यांच्या विरोधात सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. याच बरोबर त्यांनी रामचरितमानस हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित व्हावा अशी मागणीही केली आहे. यासंदर्भात धीरेंद्र शास्त्री यांनी सरकारकडे निवेदनही केले आहे.

रामचरितमानसच्या प्रती जाळल्याच्या घटनांवर राग व्यक्त करत, हे एक 'अंतरराष्ट्रीय षडयंत्र' आहे. हा प्रकार म्हणजे सनातन धर्माविरोधातील कट आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व सनातनींना संघटित व्हावे लागेल, असेही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHinduहिंदू