शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रामचरितमानस द्वेष पसरवाणारा ग्रंथ, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे, पुढे म्हणाले, या ग्रंथात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 23:20 IST

Ramcharitmanas: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे.

पाटणा - बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे. पाटणामध्ये नालंदा मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी रामचरितमानस हा समाजात फूट पाडणारा ग्रंथ असल्याचे म्हटले आहे. आता चंद्रशेखर यांच्या या विधानानंतर राजकारणाला तोंड फुटले आहे.

या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता. त्यांनी रामचरितमानस बाबत आपण वापरलेले शब्द योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये समाजातील ८५ टक्के लोकसंख्येच्या मोठ्या गटाविरोधात शिविगाळ करण्यात आली आहे. तसेच रामचरितमानसच्या उत्तरकांडामध्ये कनिष्ठ जातीचे लोक शिक्षण घेतल्यानंतर सापाप्रमाणे विषारी बनतात. हे द्वेष पसरवणारे ग्रंथ आहेत.

ते पुढे म्हणाले की, एका युगामध्ये मनुस्मृती, दुसऱ्या युगामध्ये रामचरितमानस आणि तिसऱ्या युगात गुरू गोळवलकर यांचं बंच ऑफ थॉट्स, हे सर्व देशात, समाजात द्वेष पसरवतात. द्वेष देशाला कधीही महान बनवणार नाही. देशाला महान केवळ प्रेमच बनवेल.

दरम्यान, या विधानावरून आता वादाला तोंड फुटले आहे. चंद्रशेखर यांनी दिलेल्या या विधानावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहजाद पुनावाला यांनी ट्विट केले आहे. बिहारचे शिक्षणमंत्री म्हणतात की, रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे. काही दिवसांपूर्वी जगदानंद सिंह यांनी रामजन्मभूमीला द्वेषाची भूमी म्हटलं होतं. हा केवळ योगायोग नाही तर हा व्होट बँकेचा उद्योग आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण