शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

रामचरितमानस द्वेष पसरवाणारा ग्रंथ, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे, पुढे म्हणाले, या ग्रंथात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 23:20 IST

Ramcharitmanas: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे.

पाटणा - बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे. पाटणामध्ये नालंदा मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी रामचरितमानस हा समाजात फूट पाडणारा ग्रंथ असल्याचे म्हटले आहे. आता चंद्रशेखर यांच्या या विधानानंतर राजकारणाला तोंड फुटले आहे.

या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता. त्यांनी रामचरितमानस बाबत आपण वापरलेले शब्द योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये समाजातील ८५ टक्के लोकसंख्येच्या मोठ्या गटाविरोधात शिविगाळ करण्यात आली आहे. तसेच रामचरितमानसच्या उत्तरकांडामध्ये कनिष्ठ जातीचे लोक शिक्षण घेतल्यानंतर सापाप्रमाणे विषारी बनतात. हे द्वेष पसरवणारे ग्रंथ आहेत.

ते पुढे म्हणाले की, एका युगामध्ये मनुस्मृती, दुसऱ्या युगामध्ये रामचरितमानस आणि तिसऱ्या युगात गुरू गोळवलकर यांचं बंच ऑफ थॉट्स, हे सर्व देशात, समाजात द्वेष पसरवतात. द्वेष देशाला कधीही महान बनवणार नाही. देशाला महान केवळ प्रेमच बनवेल.

दरम्यान, या विधानावरून आता वादाला तोंड फुटले आहे. चंद्रशेखर यांनी दिलेल्या या विधानावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहजाद पुनावाला यांनी ट्विट केले आहे. बिहारचे शिक्षणमंत्री म्हणतात की, रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे. काही दिवसांपूर्वी जगदानंद सिंह यांनी रामजन्मभूमीला द्वेषाची भूमी म्हटलं होतं. हा केवळ योगायोग नाही तर हा व्होट बँकेचा उद्योग आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण