शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राम मंदिराच्या छताला गळती? मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या दाव्यावर बांधकाम समितीने सत्य सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:07 IST

राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या छताला गळती लागल्याचा दावा केला. यावर आता मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सोमवारी मंदिराच्या छताला गळती असल्याचा दावा केला होता. काही वेळातच ही बातमी सर्वत्र पसरली. दरम्यान, आता मंदिर बांधकामाच्या दर्जावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले  आहेत. यावर आता राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, 'मी स्वतः मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून पावसाच्या पाण्याची गळती पाहिली आहे. त्यामागील कारण म्हणजे सध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असून, त्यामुळे त्याचे छत पूर्णपणे उघडे आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबले आणि ते छतावरूनही खाली पडले. अशा प्रकारे मोकळ्या मजल्यावर पाणी पडले. मात्र दुसऱ्या मजल्यावरील छत पुढील महिनाअखेरीस बंद होणार आहे. यामुळे ही समस्या उद्भवणार नाही.

आणीबाणीचा इतिहास - ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत काय घडलं?

गर्भगृहात भरलेल्या पाण्याबाबत नृपेंद्र मिश्रा म्हणाले, गर्भगृहात पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी हाताने काढले जाते. उर्वरित सर्व मंडपांमध्येही उतार आणि ड्रेनेजची व्यवस्था आहे. त्यामुळे तेथे पाणी साचत नाही. मंदिर निर्माण समिती करोडो राम भक्तांना आश्वासन देऊ इच्छिते की मंदिराच्या बांधकामात कोणतीही त्रुटी नाही किंवा कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही.

सोमवारी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बांधकामात निष्काळजीपणाचा आरोप केला होता. मंदिराच्या छतावरून पाणी टपकण्याची ही दुसरी वेळ असल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या पावसातही मंदिराच्या छतावरून पाणी आत आले होते. आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, देशातील नामवंत अभियंते राम ललाच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या उभारणीत काम करत आहेत, तरीही ही परिस्थिती आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्या विरोधानंतर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढण्यावर चर्चा करण्यात आली.

राम पथावरील रस्ताही खचू लागला

मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या पावसामुळे राम पथावरील रस्ताही खचू लागला आहे. सहादतगंज ते नया घाट या सुमारे साडेतेरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या ठिकाणी खोल खड्डे पडले होते. मात्र, सहदतगंज, हनुमानगढी, रिकबगंज आदी ठिकाणी खडी व माती पीडब्ल्यूडीने टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या