शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अयोध्येतील राम मंदिर बाबराने नव्हे, तर औरंगजेबाने उद्धवस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:24 IST

माजी आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

अयोध्या : येथील राम मंदिर बाबराने नव्हे तर औरंगजेब बादशहाने उद््ध्वस्त केले, असा दावा किशोर कुणाल या माजी आयपीएस अधिकाºयाने लिहिलेल्या अयोध्या रिव्हिजिटेड या पुस्तकात करण्यात आला आहे.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. या पुस्तकातील माहिती पुरावा म्हणून न्यायालयासमोर येणार का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. किशोर कुणाल १९७२च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी होते.

बाबरी मशिदीच्या आधी त्या जागेवर राम मंदिर होते. याच जागी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता या आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ किशोर कुणाल यांनी या पुस्तकात अनेक पुरावे दिले आहेत. त्यामध्ये प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील उतारे, पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननांचे अहवाल यांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माजी सरन्यायाधीश जी. बी. पटनायक यांनी म्हटले आहे की, अयोध्या वादासंदर्भात या पुस्तकामुळे नवे पैलू उजेडात आले असून, त्यांच्या समर्थनार्थ अनेक सबळ पुरावेही दिलेले आहेत. या पुस्तकात किशोर कुणाल यांनी म्हटले आहे की, राम मंदिर बाबराच्या कारकिर्दीत इ. सन १५२८मध्ये नव्हे तर औरंगजेब सत्तेवर असताना इ. सन १६६०मध्ये उद््ध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबचा सरदार फेदाई खान याच्या हातात अयोध्येची सारी सूत्रे होती. त्यामुळे राम मंदिर उद््ध्वस्त करण्याचे बाबराने आदेश दिले होते असे म्हणणे साफ चुक आहे. बाबराने अयोध्येला कधीही भेट दिली नव्हती. अवध प्रांताचा प्रमुख मीर बाकी याने इ. सन १५२८मध्ये मंदिर पाडून तिथे मशिद बांधली असा दावा अयोग्य आहे. नवाबांचा अयोध्येच्या बैराग्यांना आश्रयच्या पुस्तकात म्हटले आहे की, बाबरपासून शहाजहानपर्यंतचे मुघल बादशहा हे काही प्रमाणात उदारमतवादी होते. त्यांनी सर्वच धर्मांना आश्रय दिला होता. अवधच्या पहिल्या चार नवाबांनी अयोध्येच्या बैराग्यांनाही उदार आश्रय दिला होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. मात्र औरंगजेबाच्या कारकीर्दीत अयोध्येतील राम मंदिर पाडले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या