शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

३७0 नंतर रा. स्व. संघाचा अजेंडा; राम मंदिर आणि समान नागरी कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 06:29 IST

भुवनेश्वरमधील बैठकीआधी १५ आॅक्टोबर रोजी संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची एक बैठक होणार आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीची बैठक १७ ते २० आॅक्टोबर या काळात भुवनेश्वरमध्ये होत असून, त्यात अयोध्येतील राम मंदिर आणि देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७0 अनुच्छेद मोदी सरकारने रद्द केल्यानंतर संघाने आता राम मंदिर व समान नागरी कायदा हे मुद्दे आपल्या अजेंड्यावर आणले आहेत. नेमक्या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच रा. स. संघ हे मुद्दे चर्चेला घेत आहे.

याशिवाय अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरची स्थिती आणि नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर (एनसीआर) व अन्य महत्त्वाच्या विषयांवरही विचारमंथन केले जाईल. भुवनेश्वरमधील बैठकीआधी १५ आॅक्टोबर रोजी संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची एक बैठक होणार आहे. तसेच १६ आॅक्टोबरच्या बैठकीत कार्यकारिणी सदस्य देशातील राजकीय स्थितीसह अन्य बाबींचा आढावा घेणार आहेत.

त्यानंतर कार्यकारिणीची तीन दिवस बैठक सुरू होईल. गेल्या काही वर्षांत घेतलेल्या निर्णयांचे देशावर काय परिणाम झाले, यावर या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे. तसेच आगामी काळासाठी कोणती धोरणे राबवायची याचाही निर्णय घेण्यात येईल. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, मनमोहन वैद्य आदी ज्येष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

रा. स्व. संघाच्या परिवारातील ५५ संघटनांच्या प्रमुखांनाही या कार्यकारिणीच्या बैठकीला मुद्दाम आमंत्रित करण्यात आले आहे. भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील एखादा दिवस या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले. अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याने या बैठकीला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख आलोककुमार यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.या विषयांवर होईल विचारमंथनअयोध्येत राम मंदिर बांधणे याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने समान नागरी कायद्याचा मुद्दा काही काळानंतर हाती घ्यावा, असा एक मतप्रवाह संघामध्ये आहे. त्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती, ग्लोबल वॉर्मिंग, विविध राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका आदी विषयांवरही संघ कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसंख्या नियंत्रण, धर्मांतराच्या प्रश्नावर मोदी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आग्रही मत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ