शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

राम सेतू केव्हा आणि कसा तयार झाला? आता उलगडणार रहस्य! चालवला जाणार 'अंडर वॉटर प्रोजेक्ट'

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 14, 2021 20:26 IST

या संशोधनातून रामायण काळातील महत्वाची माहिती मिळण्यासही मदत होईल, असे या योजनेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली -भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा राम सेतू केव्हा आणि कसा तयार झाला? याचा शोध घेण्यासाठी यावर्षी राम सेतू असलेल्या भागात अंडर वॉटर प्रोजेक्ट चालवला जाणार आहे. यातून रामायण काळातील महत्वाची माहिती मिळण्यासही मदत होईल, असे या योजनेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासंदर्भात, भारतीय पुरातत्व खात्याच्या (एएसआय) केंद्रीय सल्लागार समितीने गेल्या महिन्यात सीएसआयआर- नॅशनल इन्स्टियूट ऑफ ओशनोग्राफीने (एनआयओ) केलेल्या अर्जाला मंजुरी दिली आहे.

राम सेतूशी संबंधित या संशोधनात रेडियोमॅट्रिक आणि थर्मोल्यूमिनिसेन्स (टीएल) सारख्या डेटिंग अर्थात कालमापन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. येथील पाण्यात असणाऱ्या शेवाळाचीही तपासणी केली जाणार आहे. या पाण्यामध्ये असणाऱ्या कोरल कॅल्शियम कार्बोनेटच्या मदतीने राम सेतूच्या काळाचा अंदाज लावला जाईल.

या संशोधनातून हजारो वर्षांपासून उपस्थित केल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांवरून पडदा उठणार आहे. जसे, राम सेतू मानव निर्मित आहे की नैसर्गिक? सध्या राम सेतू जसा आहे, तो पूर्वीपासूनच तसाच आहे, की त्यात काही बदल झाला? राम सेतू किती पुरातन आहे? राम सेतू खरोखरच, ज्या काळात श्रीराम पृथ्वीवर होते, असे सांगितले जाते, त्याच काळातील आहे का?

याच बरोबच, या संशोधनामुळे राम सेतूचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, हेदेखील सरकारने स्पष्ट केले आहे. कारण राम सेतूसंदर्भातील ज्या प्रश्नांची उत्तरे आजही मिळू शकलेली नाहीत, त्यांचा शोध घेणे, हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.

रामायनात उल्लेख आहे, की भगवान श्री रामचंद्रांनी पत्नी सीतेला रावनाच्या कैदेतून सोडविण्यासाठी श्रीलंकेवर स्वारी केली होती. यावेळी त्यांनी आपल्या वानर सहकाऱ्यांच्या मदतीने भारतातून लंकेत जाण्यासाठी समुद्रात सेतू बांधला होता. वानरांनी छोट्या-छोट्या दगडाच्या सहाय्याने हा पूल अथवा सेतू तयार केला होता. हा पूलच राम सेतू नावाने ओळखला जातो. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतSri Lankaश्रीलंका