शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राम सेतू केव्हा आणि कसा तयार झाला? आता उलगडणार रहस्य! चालवला जाणार 'अंडर वॉटर प्रोजेक्ट'

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 14, 2021 20:26 IST

या संशोधनातून रामायण काळातील महत्वाची माहिती मिळण्यासही मदत होईल, असे या योजनेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली -भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा राम सेतू केव्हा आणि कसा तयार झाला? याचा शोध घेण्यासाठी यावर्षी राम सेतू असलेल्या भागात अंडर वॉटर प्रोजेक्ट चालवला जाणार आहे. यातून रामायण काळातील महत्वाची माहिती मिळण्यासही मदत होईल, असे या योजनेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासंदर्भात, भारतीय पुरातत्व खात्याच्या (एएसआय) केंद्रीय सल्लागार समितीने गेल्या महिन्यात सीएसआयआर- नॅशनल इन्स्टियूट ऑफ ओशनोग्राफीने (एनआयओ) केलेल्या अर्जाला मंजुरी दिली आहे.

राम सेतूशी संबंधित या संशोधनात रेडियोमॅट्रिक आणि थर्मोल्यूमिनिसेन्स (टीएल) सारख्या डेटिंग अर्थात कालमापन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. येथील पाण्यात असणाऱ्या शेवाळाचीही तपासणी केली जाणार आहे. या पाण्यामध्ये असणाऱ्या कोरल कॅल्शियम कार्बोनेटच्या मदतीने राम सेतूच्या काळाचा अंदाज लावला जाईल.

या संशोधनातून हजारो वर्षांपासून उपस्थित केल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांवरून पडदा उठणार आहे. जसे, राम सेतू मानव निर्मित आहे की नैसर्गिक? सध्या राम सेतू जसा आहे, तो पूर्वीपासूनच तसाच आहे, की त्यात काही बदल झाला? राम सेतू किती पुरातन आहे? राम सेतू खरोखरच, ज्या काळात श्रीराम पृथ्वीवर होते, असे सांगितले जाते, त्याच काळातील आहे का?

याच बरोबच, या संशोधनामुळे राम सेतूचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, हेदेखील सरकारने स्पष्ट केले आहे. कारण राम सेतूसंदर्भातील ज्या प्रश्नांची उत्तरे आजही मिळू शकलेली नाहीत, त्यांचा शोध घेणे, हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.

रामायनात उल्लेख आहे, की भगवान श्री रामचंद्रांनी पत्नी सीतेला रावनाच्या कैदेतून सोडविण्यासाठी श्रीलंकेवर स्वारी केली होती. यावेळी त्यांनी आपल्या वानर सहकाऱ्यांच्या मदतीने भारतातून लंकेत जाण्यासाठी समुद्रात सेतू बांधला होता. वानरांनी छोट्या-छोट्या दगडाच्या सहाय्याने हा पूल अथवा सेतू तयार केला होता. हा पूलच राम सेतू नावाने ओळखला जातो. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतSri Lankaश्रीलंका