शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 16:57 IST

एकीकडे श्रीराम मंदिराचा सोहळा जवळ आला आहे, तर दुसीरकडे राजकारण तापले आहे.

Ram Mandir Inauguration : श्रीराम जन्मभुमी अयोध्येत होणाऱ्या भव्य सोहळ्याची देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा LIVE दाखवला जाणार आहे. पण, या मुद्द्यावरुन राजकारणही तीव्र झाले आहे. विरोधकांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर मोठा आरोप केला आहे. तामिळनाडू सरकारने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातल्याचा आरोप अर्थमंत्र्यांनी केला आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सीतारामन यांनी लिहिले की, 'तामिळनाडू सरकारने 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यास बंदी घातली आहे. तामिळनाडूमध्ये श्रीरामाची 200 हून अधिक मंदिरे आहेत. तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग (HR&CE) द्वारे व्यवस्थापन होणाऱ्या या मंदिरांमध्ये श्रीरामाच्या नावाने पूजा/भजन/प्रसाद वाटप/अन्नदानाला परवानगी नाही. खासगी मंदिरांनाही कार्यक्रम आयोजित करण्यापासून पोलीस रोखत आहेत. मंडप पाडू, अशी धमकी आयोजकांना देत आहेत. या हिंदुद्वेषी, घृणास्पद कृतीचा मी तीव्र निषेध करते.'

त्या पुढे म्हणतात, 'तामिळनाडूच्या अनेक भागातून धक्कादायक दृश्ये पाहायला मिळत आहेत. लोकांना भजन आयोजित करण्यापासून, गरिबांना जेवण देण्यापासून, मिठाई वाटण्यापासून, उत्सव करण्यापासून रोखले जात आहे आणि धमकावले जात आहे. अनेकांना पंतप्रधान मोदींना आणि अयोध्येतील सोहळ्याला पाहायचे आहे. पण, लाइव्ह टेलिकास्टदरम्यान वीज खंडित होण्याची शक्यता असल्याचे केबल टीव्ही ऑपरेटर्सना सांगण्यात आले आहे. I.N.D.I आघाडीतील DMK ची ही हिंदुविरोधी चाल आहे.'

'तामिळनाडू सरकार थेट प्रसारण बंदीचे समर्थन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करत आहे. ही साफ खोटे आहे. अयोध्या निकालाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पंतप्रधान मोदींनी ज्या दिवशी राम मंदिराची पायाभरणी केली, त्या दिवशीही ही समस्या उद्धभवली नाही. तामिळनाडूमध्ये प्रभू श्रीरामाचा अभिषेक उत्सव साजरा करण्यासाठी लोकांमध्ये जो उत्साह संचारला आहे, त्यामुळे हिंदुद्वेषी द्रमुक सरकार प्रचंड अस्वस्थ झाले आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्र्यांने आरोप फेटाळलेदरम्यान, राज्य सरकारमधील शेखर बाबू यांनी अर्थमंत्र्यांच्या विधानाचे खंडन केले आहे. त्यांनी लिहिले की, 'डीएमकेच्या युवा विंगच्या परिषदेवरुन लक्ष हटवण्यासाठी या अफवा पसरवल्या जात आहेत. तामिळनाडूमधील कोणत्याही मंदिरात पूजा करण्यास किंवा रामासाठी अन्नदान करण्यावर कोणतीही बंदी घातली नाही. निर्मला सीतारामन यांच्यासारखे लोक अफवा पसरवत आहेत,' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनTamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम