शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

…म्हणून लालकृष्ण अडवाणींना भूमीपूजनाला बोलावलं नाही; राम मंदिर ट्रस्टने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 19:27 IST

लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.

ठळक मुद्देभाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मंदिर भूमीपूजनाचं आमंत्रण दिलं नाहीकोरोना काळ सुरु असल्याने त्यांचे वयही जास्त आहे त्यामुळे बोलावलं नाही, फोन करुन माफी मागतल्याचं राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा खुलासा

नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जय्यत सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमीपूजन पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अवघे ४८ तास उरले आहेत. भूमीपूजन सोहळ्यासाठी २०० लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहेत. मात्र आमंत्रणाच्या यादीत राम मंदिरासाठी रथ यात्रा काढणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नाव नाही.

लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. संत महात्मा मिळून १७५ जण सहभागी असणार आहेत. पद्मश्री मिळालेले फैजाबादचे मोहम्मद युनूस खान यांनाही आमंत्रण दिलं आहे. युनूस खान हे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करतात, मृतदेह कोणत्याही धर्माचा असला तरी विधिवत अंत्यसंस्कार करतात.

लालकृष्ण अडवाणी यांना फोन करुन वैयक्तिक माफी मागण्यात आली आहे. त्यांचे वय लक्षात घेता ९० वर्षीय व्यक्ती सोहळ्याला कशी उपस्थिती लावणार असा प्रश्न होता. कल्याण सिंह यांचेही वय जास्त आहे, गर्दीच्या ठिकाणी त्यांनी येऊ नये असं सांगितले त्यांनीही होकार दिला असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चम्पत राय यांनी सांगितले.

लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या पर्यंत रथयात्रेची सुरुवात केली होती. मात्र, बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांना समस्तीपूर जिल्ह्यात अटक केली. आरोपपत्रानुसार ६ डिसेंबर १९९२ रोजी अडवाणी म्हणाले होते की, “आज कारसेवेचा शेवटचा दिवस आहे”. अडवाणींवर मशीद पाडण्याच्या कट रचल्याबद्दल अद्याप गुन्हेगारी खटला चालू आहे.

कल्याण सिंह ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ही ती तारीख आहे ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली. त्यांच्यावर पोलीस आणि प्रशासनाने कारसेवकांना मुद्दाम रोखले नाही असा आरोप आहे. नंतर कल्याण सिंह यांनी भाजपापासून दूर जाऊन नॅशनल रेव्होल्यूशन पार्टी स्थापन केली पण ते पुन्हा भाजपामध्ये परतले. मशीद पाडण्याच्या षडयंत्र रचल्याचा आरोप असलेल्या १३ लोकांपैकी कल्याण सिंह यांचे नाव होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीAyodhyaअयोध्याcorona virusकोरोना वायरस बातम्या