शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

…म्हणून लालकृष्ण अडवाणींना भूमीपूजनाला बोलावलं नाही; राम मंदिर ट्रस्टने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 19:27 IST

लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.

ठळक मुद्देभाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मंदिर भूमीपूजनाचं आमंत्रण दिलं नाहीकोरोना काळ सुरु असल्याने त्यांचे वयही जास्त आहे त्यामुळे बोलावलं नाही, फोन करुन माफी मागतल्याचं राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा खुलासा

नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जय्यत सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमीपूजन पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अवघे ४८ तास उरले आहेत. भूमीपूजन सोहळ्यासाठी २०० लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहेत. मात्र आमंत्रणाच्या यादीत राम मंदिरासाठी रथ यात्रा काढणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नाव नाही.

लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. संत महात्मा मिळून १७५ जण सहभागी असणार आहेत. पद्मश्री मिळालेले फैजाबादचे मोहम्मद युनूस खान यांनाही आमंत्रण दिलं आहे. युनूस खान हे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करतात, मृतदेह कोणत्याही धर्माचा असला तरी विधिवत अंत्यसंस्कार करतात.

लालकृष्ण अडवाणी यांना फोन करुन वैयक्तिक माफी मागण्यात आली आहे. त्यांचे वय लक्षात घेता ९० वर्षीय व्यक्ती सोहळ्याला कशी उपस्थिती लावणार असा प्रश्न होता. कल्याण सिंह यांचेही वय जास्त आहे, गर्दीच्या ठिकाणी त्यांनी येऊ नये असं सांगितले त्यांनीही होकार दिला असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चम्पत राय यांनी सांगितले.

लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या पर्यंत रथयात्रेची सुरुवात केली होती. मात्र, बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांना समस्तीपूर जिल्ह्यात अटक केली. आरोपपत्रानुसार ६ डिसेंबर १९९२ रोजी अडवाणी म्हणाले होते की, “आज कारसेवेचा शेवटचा दिवस आहे”. अडवाणींवर मशीद पाडण्याच्या कट रचल्याबद्दल अद्याप गुन्हेगारी खटला चालू आहे.

कल्याण सिंह ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ही ती तारीख आहे ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली. त्यांच्यावर पोलीस आणि प्रशासनाने कारसेवकांना मुद्दाम रोखले नाही असा आरोप आहे. नंतर कल्याण सिंह यांनी भाजपापासून दूर जाऊन नॅशनल रेव्होल्यूशन पार्टी स्थापन केली पण ते पुन्हा भाजपामध्ये परतले. मशीद पाडण्याच्या षडयंत्र रचल्याचा आरोप असलेल्या १३ लोकांपैकी कल्याण सिंह यांचे नाव होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीAyodhyaअयोध्याcorona virusकोरोना वायरस बातम्या