शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रामभक्त गांधीजी, तेव्हा रामनामाचे बीज गांधीजींनी मिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:44 IST

अंधाराविरुद्ध काय करावे लागते? लाठ्या-काठ्या हाती घेऊन काही अंधार घालवता येणार नसतो.

- प्रा. डॉ. विश्वास पाटील

बालपणी गांधीजींना घरात ‘मोनिया’ म्हणून हाक मारत असत. मोहनला अंधाराची फार भीती वाटायची. बालपणी सर्वांनाच अंधाराचे भय वाटत असते. साप, चोराचिलटांची भीती वाटते. गांधीजींच्या घरात एक मोलकरीण होती. तिचे धाव होते रंभा. तिने मोहनला सांगितले, ‘मोहन, अंधाराला भिऊ नकोस. धैर्याने सामोरा जा. रामाचे नाव घे. राम जणू काही प्रकाशाची शलाका. अंधारावर मात कर.’ मग गांधीजी आयुष्यभर अंधाराशी झुंजत राहिले. अंधार मग तो अन्यायाचा असो वा अत्याचाराचा. अहंकाराचा असो वा अनीतीचा. पापाचा असो वा ढोंगाचा. नकली मोठेपणाचा असो वा पोकळ पांडित्याचा. नकाराचा असो वा नास्तिकतेचा. खरे तर अंधाराचे अस्तित्वच मुळी नसते. असतो तो प्रकाशाचा अभाव.

अंधाराविरुद्ध काय करावे लागते? लाठ्या-काठ्या हाती घेऊन काही अंधार घालवता येणार नसतो. तलवार चालवून अंधाराला पिटाळून लावता येत नसते. एक प्रकाशाचे आश्वासन जागले की संपला की हो अंधकार. एक छोटीशी मेणबत्ती जागली की, अंधार संपून जातो. एक छोटीशी दिवली मिणमिणत असली की, अंधकाराची सत्ता नेस्तनाबूत होते. मोहनच्या हे लक्षात आले. गांधीजींनी आत्मचरित्रात हे लिहून ठेवले आहे की, हे सत्य त्यांना मंदिरात कळले नाही. ते दाईने शिकविले. ती कुटुंबाची जुनी नोकर होती. तिच्या प्रेमाचे स्मरण गांधीजी करत राहिले होते. रंभेने समजावून सांगितले की, बाळा रे, रामाचे नाव घे. रामनाम हे अंधाराविरुद्धचे फार मोठे शस्त्र आहे. मोठा उपाय आहे. त्याचा आश्रय घे. बालपणी हे रामनामविषयक विचाराचे बीज रंभेने पेरले. हे प्रकाश बीज रंभेने पेरले. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत गांधीजींनी या रामनामाचा आधार घेतला. अंधाराचा मुकाबला केला. अखेरच्या क्षणी रामाचे नाव मुखात असताना त्यांनी बलिदान स्वीकारले. खरे रामभक्त दोनच आहेत. एक आहेत अंजनीनंदन हनुमान आणि दुसरे आहेत गांधीजी. एकाने छाती चिरून रामरायाचे दर्शन घडविले. दुसऱ्याची छाती चिरली गेल्यावर जगाला रामरायाचे दर्शन घडले. हे रामनामाचे बीज गांधीजींनी आपल्या छातीत मिरविले. त्याचे जतन केले. त्याचे मनाच्या भूमीत रोपण केले. श्रद्धेने जोपासना केली. श्रमाच्या घामाने ते वाढविले. त्याचा विराट वटवृक्ष झाला. त्या वडाच्या झाडाखाली वसणाºया या देशाला भयमुक्तीची दिशा कळली. दीक्षा मिळाली. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी