शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रामभक्त गांधीजी, तेव्हा रामनामाचे बीज गांधीजींनी मिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:44 IST

अंधाराविरुद्ध काय करावे लागते? लाठ्या-काठ्या हाती घेऊन काही अंधार घालवता येणार नसतो.

- प्रा. डॉ. विश्वास पाटील

बालपणी गांधीजींना घरात ‘मोनिया’ म्हणून हाक मारत असत. मोहनला अंधाराची फार भीती वाटायची. बालपणी सर्वांनाच अंधाराचे भय वाटत असते. साप, चोराचिलटांची भीती वाटते. गांधीजींच्या घरात एक मोलकरीण होती. तिचे धाव होते रंभा. तिने मोहनला सांगितले, ‘मोहन, अंधाराला भिऊ नकोस. धैर्याने सामोरा जा. रामाचे नाव घे. राम जणू काही प्रकाशाची शलाका. अंधारावर मात कर.’ मग गांधीजी आयुष्यभर अंधाराशी झुंजत राहिले. अंधार मग तो अन्यायाचा असो वा अत्याचाराचा. अहंकाराचा असो वा अनीतीचा. पापाचा असो वा ढोंगाचा. नकली मोठेपणाचा असो वा पोकळ पांडित्याचा. नकाराचा असो वा नास्तिकतेचा. खरे तर अंधाराचे अस्तित्वच मुळी नसते. असतो तो प्रकाशाचा अभाव.

अंधाराविरुद्ध काय करावे लागते? लाठ्या-काठ्या हाती घेऊन काही अंधार घालवता येणार नसतो. तलवार चालवून अंधाराला पिटाळून लावता येत नसते. एक प्रकाशाचे आश्वासन जागले की संपला की हो अंधकार. एक छोटीशी मेणबत्ती जागली की, अंधार संपून जातो. एक छोटीशी दिवली मिणमिणत असली की, अंधकाराची सत्ता नेस्तनाबूत होते. मोहनच्या हे लक्षात आले. गांधीजींनी आत्मचरित्रात हे लिहून ठेवले आहे की, हे सत्य त्यांना मंदिरात कळले नाही. ते दाईने शिकविले. ती कुटुंबाची जुनी नोकर होती. तिच्या प्रेमाचे स्मरण गांधीजी करत राहिले होते. रंभेने समजावून सांगितले की, बाळा रे, रामाचे नाव घे. रामनाम हे अंधाराविरुद्धचे फार मोठे शस्त्र आहे. मोठा उपाय आहे. त्याचा आश्रय घे. बालपणी हे रामनामविषयक विचाराचे बीज रंभेने पेरले. हे प्रकाश बीज रंभेने पेरले. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत गांधीजींनी या रामनामाचा आधार घेतला. अंधाराचा मुकाबला केला. अखेरच्या क्षणी रामाचे नाव मुखात असताना त्यांनी बलिदान स्वीकारले. खरे रामभक्त दोनच आहेत. एक आहेत अंजनीनंदन हनुमान आणि दुसरे आहेत गांधीजी. एकाने छाती चिरून रामरायाचे दर्शन घडविले. दुसऱ्याची छाती चिरली गेल्यावर जगाला रामरायाचे दर्शन घडले. हे रामनामाचे बीज गांधीजींनी आपल्या छातीत मिरविले. त्याचे जतन केले. त्याचे मनाच्या भूमीत रोपण केले. श्रद्धेने जोपासना केली. श्रमाच्या घामाने ते वाढविले. त्याचा विराट वटवृक्ष झाला. त्या वडाच्या झाडाखाली वसणाºया या देशाला भयमुक्तीची दिशा कळली. दीक्षा मिळाली. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी