शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी; गुजरातमध्ये राकेश टिकैत यांची महापंचायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 08:46 IST

rakesh tikait in gujarat: राजस्थानच्या अबू रोड येथून राकेश टिकैत गुजरातमध्ये दाखल झाले.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा गुजरात दौराराजस्थानमधून टिकैत गुजरातमध्ये दाखलपालमपूर येथे किसान महापंचायतीला केले संबोधित

पालमपूर: वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. तर, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देशातील विविध राज्यांमध्ये दौरे करत शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारी राजस्थानच्या अबू रोड येथून राकेश टिकैतगुजरातमध्ये दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर व्हायला हवी, असे टिकैत म्हणाले. (rakesh tikait on gujarat visit)

राकेश टिकैत यांनी बनासकांठा येथील पालमपूरमध्ये किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी टिकैत यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी शंकर सिंह वाघेला उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी, असे टिकैत म्हणाले. 

१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार

आंदोलनात कसे सहभागी व्हायचे हे तुम्ही ठरवा

गुजरातमधील शेतकऱ्यांनी आंदोलनात कसे सहभागी व्हायचे, हे तुम्हीच ठरवायला हवे. युवकांनी, तरुण वर्गाने अधिकाधिक संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला हवे, असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. केंद्र सरकार संपूर्ण देशात गुजरात मॉडेल लागू करू इच्छिते, अशी टीका करत रिलायन्सला ६० गावे देऊन टाकली. तसेच देशभरातील शेतकऱ्यांची जमीन कंपनी, व्यवसायिकांना देऊन टाकण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा दावा टिकैत यांनी केला. 

सरकार शेतकऱ्याच्या विरोधात

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून, त्यांचे केवळ शोषण सुरू आहे. सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नाहीत, असा आरोप टिकैत यांनी केला. गुजरातमध्ये प्रवेश करताना कोरोना रिपोर्टबाबत विचारले असता, ते टिकैत म्हणाले की, त्यांच्याकडे सर्व प्रकारची कागदपत्रे आहेत. आपला पासपोर्ट दाखवत, आता गुजरातमध्ये प्रवेश करण्यासाठी याची आवश्यकता आहे का, असा खोचक टोला टिकैत यांनी लगावला. 

दरम्यान, १०० वेळा हल्ले झाले, तरी नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल करणार नाही. महापंचायत थांबणार नाही, त्या होतच राहणार, एवढेच नाही तर, शेतकरी आंदोलनही थांबणार नाही, असा एल्गार टिकैत यांनी केला. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात आहे.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनGujaratगुजरात