शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Farmers Protest: कोरोना झाला तरी चालेल, पण घरी जाणार नाही; राकेश टिकैत यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 19:32 IST

farmers protest: दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास विलंबशेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दावे फेटाळलेऑक्सिजन निर्मात्यांचा बोलविता धनी शोधून काढू - टिकैत

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असून, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लस यांचा तुटवडा जाणवत आहे. तर, दुसरीकडे अद्यापही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात भाष्य करताना भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोरोना झाला, तरी चालेल पण घरी जाणार नाही, असा निर्धार केला आहे. (rakesh tikait replied on oxygen suppliers who claims their vehicles getting late because of farmers protest)

दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिल्लीच्यी सीमांवरील महामार्गांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब लागत आहे, असा दावा काही ऑक्सिजन निर्मात्यांनी केला आहे. या दाव्याला राकेश टिकैत यांनी फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा: राजेश टोपे

काही झाले, तरी घरी जाणार नाही

ऑक्सिजन निर्मात्यांचा दावा चुकीचा असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी टिकैत यांनी केली आहे. तसेच येथे आम्ही क्वारंटाइन झालेलो आहोत. आम्ही घरी जाऊ. परंतु, दिल्लीतील रोग घेऊन जाणार नाही. कोरोना झाला, तरी येथील मॅक्स रुग्णालयात उपचार घेऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. याशिवाय दिल्ली सीमांवरून वाहने विनाअडथळा, न थांबता पुढे जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

निर्मात्यांचा बोलविता धनी शोधून काढू

ऑक्सिजन निर्मात्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेऊ. रुग्णवाहिकेसह शेकडो वाहने या मार्गावरून व्यवस्थितपणे ये-जा करत आहेत. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणारी वाहने कुठे थांबताहेत, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. या मार्गावरून दिवसाला सुमारे ३०० रुग्णवाहिका प्रवास करत असल्याचेही ते म्हणाले. शेतकरीविरोधी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, याची नक्कीच चौकशी करण्यात येईल, असेही राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.   

महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्ली