शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Farmers Protest: कोरोना झाला तरी चालेल, पण घरी जाणार नाही; राकेश टिकैत यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 19:32 IST

farmers protest: दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास विलंबशेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दावे फेटाळलेऑक्सिजन निर्मात्यांचा बोलविता धनी शोधून काढू - टिकैत

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असून, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लस यांचा तुटवडा जाणवत आहे. तर, दुसरीकडे अद्यापही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात भाष्य करताना भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोरोना झाला, तरी चालेल पण घरी जाणार नाही, असा निर्धार केला आहे. (rakesh tikait replied on oxygen suppliers who claims their vehicles getting late because of farmers protest)

दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिल्लीच्यी सीमांवरील महामार्गांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब लागत आहे, असा दावा काही ऑक्सिजन निर्मात्यांनी केला आहे. या दाव्याला राकेश टिकैत यांनी फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा: राजेश टोपे

काही झाले, तरी घरी जाणार नाही

ऑक्सिजन निर्मात्यांचा दावा चुकीचा असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी टिकैत यांनी केली आहे. तसेच येथे आम्ही क्वारंटाइन झालेलो आहोत. आम्ही घरी जाऊ. परंतु, दिल्लीतील रोग घेऊन जाणार नाही. कोरोना झाला, तरी येथील मॅक्स रुग्णालयात उपचार घेऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. याशिवाय दिल्ली सीमांवरून वाहने विनाअडथळा, न थांबता पुढे जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

निर्मात्यांचा बोलविता धनी शोधून काढू

ऑक्सिजन निर्मात्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेऊ. रुग्णवाहिकेसह शेकडो वाहने या मार्गावरून व्यवस्थितपणे ये-जा करत आहेत. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणारी वाहने कुठे थांबताहेत, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. या मार्गावरून दिवसाला सुमारे ३०० रुग्णवाहिका प्रवास करत असल्याचेही ते म्हणाले. शेतकरीविरोधी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, याची नक्कीच चौकशी करण्यात येईल, असेही राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.   

महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्ली