शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

By देवेश फडके | Updated: February 17, 2021 10:19 IST

दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे. रोहतकमधील सांपला जिल्ह्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशनंतर आता पश्चिम बंगालमध्ये किसान महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये आता किसान पंचायत होणारशेतकरी नेते राकेश टिकैत यांची घोषणापंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका

रोहतक : दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे. रोहतकमधील सांपला जिल्ह्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशनंतर आता पश्चिम बंगालमध्ये किसान महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीका केली. (rakesh tikait declared that now farmers protest kisan panchayat will have in west bengal)

श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही. भाजपवाल्यांनी महात्मा गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही आंदोलनजीवी करून टाकले आहे. ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर माफी मागायला हवी, अशी मागणी राकेश टिकैत यांनी यावेळी केली. 

काही झाले तरी राम मंदिरासाठी देणगी देणार नाही; सिद्धारामैय्या यांनी केले स्पष्ट

पश्चिम बंगालमध्ये किसान पंचायत

केंद्रीय कृषी कायद्यामुळे सामान्य जनता नाही, तर पशूंचाही भूकबळी जाईल. पश्चिम बंगालमधील शेतकरी दुःखी आहेत. त्यांना त्यांच्या पीकाची योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे तेथेही किसान पंचायतीचे आयोजन केले जाईल, असे राकेश टिकैत यांनी जाहीर केले. शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना मते देऊ नका, असे आवाहन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. 

हनुमंतांनी श्रीरामांना मदत केली

वास्तविक पाहता हनुमंतांचा लंकेशी काही वाद नव्हता. मात्र, प्रभू श्रीरामांना मदत करण्यासाठी ते लंकेत गेले. भाजपवाल्यांचा श्रीरामांशी काही संबंध नाही. त्यांना श्रीरामचंद्रांशी काही घेणे देणे नाही, असा दावा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, राकेश टिकैत अनेक ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या किसान पंचायतींना संबोधित करत आहेत. केंद्र सरकारविरुद्ध बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात ही सभा होणार आहे. तर, अकोल्यातील किसान कैफीयत शेतकरी महापंचायत रद्द करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकार