शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:44 IST

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं

ठळक मुद्देगाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरू नानक जयंतीदिनी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एकच जल्लोष झाला. शेतकऱ्यांनी जिलेबी वाटून आपल्या लढ्याला यश आल्याचं सेलिब्रेशन केलं. यावेळी, अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. दिल्लीच्या सीमारेषेवरील या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान आंदोलनाचे प्रमुक राकेश टीकैत यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं. त्यानंतर, शहापूर मार्गे सोरम या गावी पोहोचला. गावातही त्यांचं जोरजोरात स्वागत करण्यात आलं. बुधवारी रात्री उशिरा 1.00 वाजता सिसौलीच्या पट्टी चौधरीस्थित आपल्या गावातील घरी ते पोहोचले. यावेळी टिकैत यांचं संपूर्ण कुटुंब भावूक झाल्याचं दिसून आलं. घरातील सर्वच महिलांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, राकेश यांची मोठी बहीण ओमबीरी यांनी राकेश टिकैत यांना टीळा लावत त्यांचं औक्षण केलं. तत्पूर्वी त्यांनी किसान भवन येथे जाऊन वडिल चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

गाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं. जोपर्यंत केंद्र सरकार तीन कृषी कायदे वापस घेत नाही, तोपर्यंत आपण घरी वापस जाणार नाही, असा एल्गारच टिकैत यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. अखेर, या आंदोलकांनी सरकारला आपल्यापुढे झुकायला लावले. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर, संसदेत हे तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतरच राकेश टिकैत यांनी आपल्या घराची वाट धरली. त्यामुळे, तब्बल 383 दिवसांनी घरी पोहचताच, त्यांचे कुटुंब भावनिक झाल्याचे दिसून आले.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी