शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:44 IST

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं

ठळक मुद्देगाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरू नानक जयंतीदिनी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एकच जल्लोष झाला. शेतकऱ्यांनी जिलेबी वाटून आपल्या लढ्याला यश आल्याचं सेलिब्रेशन केलं. यावेळी, अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. दिल्लीच्या सीमारेषेवरील या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान आंदोलनाचे प्रमुक राकेश टीकैत यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं. त्यानंतर, शहापूर मार्गे सोरम या गावी पोहोचला. गावातही त्यांचं जोरजोरात स्वागत करण्यात आलं. बुधवारी रात्री उशिरा 1.00 वाजता सिसौलीच्या पट्टी चौधरीस्थित आपल्या गावातील घरी ते पोहोचले. यावेळी टिकैत यांचं संपूर्ण कुटुंब भावूक झाल्याचं दिसून आलं. घरातील सर्वच महिलांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, राकेश यांची मोठी बहीण ओमबीरी यांनी राकेश टिकैत यांना टीळा लावत त्यांचं औक्षण केलं. तत्पूर्वी त्यांनी किसान भवन येथे जाऊन वडिल चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

गाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं. जोपर्यंत केंद्र सरकार तीन कृषी कायदे वापस घेत नाही, तोपर्यंत आपण घरी वापस जाणार नाही, असा एल्गारच टिकैत यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. अखेर, या आंदोलकांनी सरकारला आपल्यापुढे झुकायला लावले. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर, संसदेत हे तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतरच राकेश टिकैत यांनी आपल्या घराची वाट धरली. त्यामुळे, तब्बल 383 दिवसांनी घरी पोहचताच, त्यांचे कुटुंब भावनिक झाल्याचे दिसून आले.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी