शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:44 IST

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं

ठळक मुद्देगाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरू नानक जयंतीदिनी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एकच जल्लोष झाला. शेतकऱ्यांनी जिलेबी वाटून आपल्या लढ्याला यश आल्याचं सेलिब्रेशन केलं. यावेळी, अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. दिल्लीच्या सीमारेषेवरील या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान आंदोलनाचे प्रमुक राकेश टीकैत यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं. त्यानंतर, शहापूर मार्गे सोरम या गावी पोहोचला. गावातही त्यांचं जोरजोरात स्वागत करण्यात आलं. बुधवारी रात्री उशिरा 1.00 वाजता सिसौलीच्या पट्टी चौधरीस्थित आपल्या गावातील घरी ते पोहोचले. यावेळी टिकैत यांचं संपूर्ण कुटुंब भावूक झाल्याचं दिसून आलं. घरातील सर्वच महिलांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, राकेश यांची मोठी बहीण ओमबीरी यांनी राकेश टिकैत यांना टीळा लावत त्यांचं औक्षण केलं. तत्पूर्वी त्यांनी किसान भवन येथे जाऊन वडिल चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

गाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं. जोपर्यंत केंद्र सरकार तीन कृषी कायदे वापस घेत नाही, तोपर्यंत आपण घरी वापस जाणार नाही, असा एल्गारच टिकैत यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. अखेर, या आंदोलकांनी सरकारला आपल्यापुढे झुकायला लावले. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर, संसदेत हे तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतरच राकेश टिकैत यांनी आपल्या घराची वाट धरली. त्यामुळे, तब्बल 383 दिवसांनी घरी पोहचताच, त्यांचे कुटुंब भावनिक झाल्याचे दिसून आले.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी