शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेसाठी ‘आप’मध्ये मैं.. मैं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:16 IST

नवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. सेवानिवृत्त सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती, नोबेल पुरस्काराने सन्मानित कैलाश सत्यार्थी यांना ‘आप’च्या वतीने राज्यसभेत पाठवायची केजरीवाल यांची खूप इच्छा होती, असे समजते.राज्यसभेच्या येत्या १६ जानेवारी रोजी होणाºया द्वैवार्षिक निवडणुकांत ‘आप’ला तिन्ही जागा जिंकता येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही केजरीवाल यांनी ही संधी देऊ केली होती, परंतु राजन यांनी शिकागो विद्यापीठातील शिकवण्याचे पूर्णवेळचे काम सोडण्याचा विचार नसल्याचे सांगून नकार दिला होता.‘आप’च्या विधि शाखेचे प्रमुख गोपाल सुब्रमणियम आणि यशवंत सिन्हा व अरुण शौरी हे माजी केंद्रीय मंत्री यांच्याही नावांचा उल्लेख झाला आहे. सिन्हा हे नुकतेच एका कार्यक्रमात केजरीवाल यांच्यासोबत व्यासपीठावर होते व त्यांनी केजरीवालांचे भरपूर कौतुकही केले होते. आपच्या सुरुवातीच्या वर्षांतील सहानुभूतीदार उद्योगपती राजीव बजाज आणि सुनील मुंजाळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे, असे कळते. परंतु त्यांनी आम्हाला राजकीय भूमिकेत शिरायचे नाही, असे स्पष्ट केले.राज्यसभेत संधी मिळण्यासाठी पक्षातील बंडाला केजरीवाल तोंड देत आहेत. ‘आप’चे संस्थापक कुमार विश्वास यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या कार्यालयापाशी चार तास धरणे धरले.आशुतोष, संजय सिंह आणि आशिष खेतान आदी वरिष्ठ नेत्यांचेही प्रयत्न आहेत. ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी केजरीवाल पक्षाचा पाया व्यापक करण्याच्या प्रयत्नांत आहेत.राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी ‘आप’ला चार राज्यांत सहाटक्के मते मिळवावी लागतीलकिंवा तीन राज्यांत लोकसभेच्या ११ जागा जिंकाव्या लागतील. चार राज्यांत सहा टक्के मते मिळवण्यासाठी ‘आप’ राज्याराज्यांत निवडणूक लढवत आहे.>पुढील आठवड्यात होणार नावे निश्चितराज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरपासून भरता येतील व पाच जानेवारी हा त्याचा शेवटचा दिवस आहे. ‘आप’ची राजकीय व्यवहार समिती पुढील आठवड्यात पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित करील. चर्चा अशीहीआहे की केजरीवाल हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यासाठी स्वत:च राज्यसभेत जातील व दिल्लीची सूत्रे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडे देतील. काँग्रेसचे तीन खासदार जनार्दन द्विवेदी, परवेझ हाशमी आणि डॉ. करण सिंह यांचा कार्यकाळ २७ जानेवारी रोजी संपत आहे आणि ‘आप’कडे दिल्ली विधानसभेत ६६ आमदार असल्यामुळे त्याला तीन जागा जिंकता येणार आहेत.