शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

राज्यसभेसाठी ‘आप’मध्ये मैं.. मैं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:16 IST

नवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. सेवानिवृत्त सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती, नोबेल पुरस्काराने सन्मानित कैलाश सत्यार्थी यांना ‘आप’च्या वतीने राज्यसभेत पाठवायची केजरीवाल यांची खूप इच्छा होती, असे समजते.राज्यसभेच्या येत्या १६ जानेवारी रोजी होणाºया द्वैवार्षिक निवडणुकांत ‘आप’ला तिन्ही जागा जिंकता येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही केजरीवाल यांनी ही संधी देऊ केली होती, परंतु राजन यांनी शिकागो विद्यापीठातील शिकवण्याचे पूर्णवेळचे काम सोडण्याचा विचार नसल्याचे सांगून नकार दिला होता.‘आप’च्या विधि शाखेचे प्रमुख गोपाल सुब्रमणियम आणि यशवंत सिन्हा व अरुण शौरी हे माजी केंद्रीय मंत्री यांच्याही नावांचा उल्लेख झाला आहे. सिन्हा हे नुकतेच एका कार्यक्रमात केजरीवाल यांच्यासोबत व्यासपीठावर होते व त्यांनी केजरीवालांचे भरपूर कौतुकही केले होते. आपच्या सुरुवातीच्या वर्षांतील सहानुभूतीदार उद्योगपती राजीव बजाज आणि सुनील मुंजाळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे, असे कळते. परंतु त्यांनी आम्हाला राजकीय भूमिकेत शिरायचे नाही, असे स्पष्ट केले.राज्यसभेत संधी मिळण्यासाठी पक्षातील बंडाला केजरीवाल तोंड देत आहेत. ‘आप’चे संस्थापक कुमार विश्वास यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या कार्यालयापाशी चार तास धरणे धरले.आशुतोष, संजय सिंह आणि आशिष खेतान आदी वरिष्ठ नेत्यांचेही प्रयत्न आहेत. ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी केजरीवाल पक्षाचा पाया व्यापक करण्याच्या प्रयत्नांत आहेत.राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी ‘आप’ला चार राज्यांत सहाटक्के मते मिळवावी लागतीलकिंवा तीन राज्यांत लोकसभेच्या ११ जागा जिंकाव्या लागतील. चार राज्यांत सहा टक्के मते मिळवण्यासाठी ‘आप’ राज्याराज्यांत निवडणूक लढवत आहे.>पुढील आठवड्यात होणार नावे निश्चितराज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरपासून भरता येतील व पाच जानेवारी हा त्याचा शेवटचा दिवस आहे. ‘आप’ची राजकीय व्यवहार समिती पुढील आठवड्यात पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित करील. चर्चा अशीहीआहे की केजरीवाल हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यासाठी स्वत:च राज्यसभेत जातील व दिल्लीची सूत्रे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडे देतील. काँग्रेसचे तीन खासदार जनार्दन द्विवेदी, परवेझ हाशमी आणि डॉ. करण सिंह यांचा कार्यकाळ २७ जानेवारी रोजी संपत आहे आणि ‘आप’कडे दिल्ली विधानसभेत ६६ आमदार असल्यामुळे त्याला तीन जागा जिंकता येणार आहेत.