शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राज्यसभा १0 वेळा तहकूब, भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयक झालेच नाही मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:39 IST

आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला. अखेर सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी उपसभापती पी.जे. कुरियन यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू होताच केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांना भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयक मांडण्यास सभापतींनी अनुमती दिली. हे विधेयक सादर करताच, सभागृहात गोंधळ सुरू झाला. बहुतांश विरोधक घोषणा देत सभापतींसमोरील आसनासमोर उतरले. त्यामुळे आधी ३0 मिनिटांसाठी तर नंतर दुपारी २.४३ वाजता तसेच ३.१३, ३.३९, ३.५४,४.१0,४.३0, ४.४५, व ४.५५ वाजता गदारोळामुळे कामकाज तहकूब होत गेले.उपसभापतींनी गोंधळ करणाऱ्यांना जाण्याचे आदेश देताना हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या सुखेन्दु शेखर यांनी मतविभाजनाची मागणी केली. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले की, राज्यसभेत अनेक नवे सदस्य आले आहेत. त्यांची नावे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर नसल्याने मतदानात त्यांना तांत्रिक अडचणी आहेत. त्यापेक्षा कामकाज तहकूब करणे उचित ठरेल.त्यावर संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार म्हणाले की, शर्मा सभागृहाची दिशाभूल करीत आहेत, विधेयक मंजूर करता येऊ शकते. राज्यमंत्री विजय गोयल म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात कठोर तरतुदींचे हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे. गेले १९ दिवस सभागृहात कामकाज झालेले नाही. अशा प्रकारे सभागृहाला वेठीला धरणे सर्वथा अनुचित आहे. विरोधी सदस्यांनी विधेयक मंजुरीला सहकार्य करावे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीही नवे सदस्य जरूर मतदान करू शकतात, जुन्या सदस्यांप्रमाणे त्यांनाही मतदानाचा अधिकार आहेच असा दावा केला. उपसभापती कुरियन म्हणाले, तांत्रिक अडचण असल्यास नव्या सदस्यांचे कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान घेता येईल. मात्र विरोधक ऐकायला तयार नसल्याने आणखी तीनदा कामकाज तहकूब झाले.सायंकाळी ५.११ वाजता उपसभापती कुरियन यांनी अत्यंत विनवणीच्या स्वरात सदस्यांना विधेयकाच्या मंजुरीबाबत मत विचारले. निवडून आलेल्या सरकारला संसदेत विधेयक मंजूर करण्याचा अधिकार नाही काय? असा प्रश्नही त्यांनी केला. तृणमूलचे सुखेन्दु शेखर म्हणाले की मतविभाजन शक्य नसेल तर कामकाज तहकूब करण्याशिवाय पर्यायच नाही. या सर्व काळात उपसभापतींच्या आसनासमोर विरोधी सदस्यांची घोषणाबाजी व गोंधळ चालूच होता. अखेर सायंकाळी ५.१४ वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.उपसभापतीपदाची आॅफर नाही : राऊ तशिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजपा नेते तयार आहेत, या वृत्ताचा संजय राऊ त यांनी ठामपणे इन्कार केला आहे. अशी कोणतीही आॅफर भाजपाकडून आलेली नाही, आली तरी शिवसेना ती स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत शिवसेनेचे संजय राऊ त, राजकुमार धूत व अनिल देसाई हे तीन सदस्य आहेत. तिघांमधे संजयराऊ त सर्वात अनुभवी आहेत. हा प्रस्ताव स्वीकारल्यास या मानाच्या पदावर त्यांची अथवा अनिल देसार्इंची वर्णी लागू शकते.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदIndiaभारतPoliticsराजकारण