शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

राजीव सरकार उलथवण्याचा होता लष्कराचा कट!

By admin | Updated: October 5, 2015 03:52 IST

राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता

चंदीगड : राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला(त्यात पश्चिम कमांडचाही सहभाग होता) दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता, असा खळबळजनक दावा लष्कराच्या पश्चिम कमांडचे माजी कमांडर लेप्ट. जन. पी.एन. हून यांनी केला आहे.तत्कालीन लष्करप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी व उपलष्करप्रमुख लेप्ट. जन. एस.एफ. रॉड्रिग्ज यांचाही या कटात सहभाग होता, असेही ८६वर्षीय हून यांनी नुकत्याच प्रकाशित ‘द अनटोल्ड ट्रुथ’ या पुस्तकात नमूद केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजीव गांधी यांच्याशी सख्य नसलेल्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी हा कट रचताना लष्कराला हाताशी धरले होते. १९८७मध्ये पंजाबचे तत्कालीन राज्यपाल सिद्धार्थ शंकर रे यांनी चंदीगडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्यानी झैलसिंग यांनी राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचा तसेच त्यांना १९८४च्या शीख दंगलीतील पीडितांची चिंता नसल्याचा आरोप केला होता.हून हे वेस्टर्न कमांडचे प्रमुख असताना मे-जून १९८७मध्ये कार्यालयीन कामासाठी दिल्लीत गेले असता त्यांना बटालियन मूव्ह करण्याबाबत संदेश मिळाला होता. लष्कराच्या मुख्यालयाला तीन पॅरा-कमांडो बटालियन हलविण्याबाबत पत्र पाठविण्यात आल्याची माहिती त्यात होती. पश्चिम कमांडच्या अंतर्गत असलेली पहिली तसेच उत्तर आणि दक्षिण कमांडच्या नवव्या आणि दहाव्या बटालियनला दिल्लीत कूच करण्याचा तो आदेश होता. विशेष दलांची मागणी करण्यात आल्याबाबत मी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे प्रधान सचिव गोपी अरोरा यांना घडामोडींची माहिती दिली. या बटालियन रॉड्रिग्ज यांच्या नियंत्रणाखाली ठेवल्या जाणार होत्या. देशासाठीच नव्हे तर राजकीय यंत्रणेला हादरा देणारा असा हा आदेश असल्याची कल्पना मला होती. मी त्यावेळी दिल्ली एरिया कमांडरला माझ्या आदेशाखेरीज सैन्य हलवू नका, असा आदेश देत ही मोहीम यशस्वी होऊ दिली नाही, असा दावाही हून यांनी या पुस्तकात केला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)———————————————-लष्करी राजवटीची भीतीहून हे आॅक्टोबर १९८७ मध्ये निवृत्त झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री विद्याचरण शुक्ला यांंना लष्कराच्या हालचालींची माहिती होती, असे हून यांनी त्यांच्या पुस्तकात ‘ ग्यानी झैलसिंग विरुद्ध राजीव गांधी’ या दहाव्या प्रकरणात म्हटले आहे. त्यावेळी शुक्ला हे चांदमिनार येथे खास माझी भेट घेण्यासाठी आले होते. राजीव गांधी यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यास लष्कराच्या हाती सत्ता सोपविली जाण्याची भीती तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना होती, असेही हून यांनी म्हटले. अनेक युद्धांत सहभागाचा अनुभव असलेले ९४ वर्षीय एअर मार्शल रणधीरसिंग यांनी मात्र हून यांच्या दाव्याला छेद दिला आहे. लष्करी उठावाचा कोणताही प्रयत्न कधीही झाला नाही. भारतीय जवानांना दिले जात असलेले पारंपरिक प्रशिक्षण त्या स्वरूपाचे नाही, असेही त्यांनी नमूद केले.