शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

राजीव सरकार उलथवण्याचा होता लष्कराचा कट!

By admin | Updated: October 5, 2015 03:52 IST

राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता

चंदीगड : राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला(त्यात पश्चिम कमांडचाही सहभाग होता) दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता, असा खळबळजनक दावा लष्कराच्या पश्चिम कमांडचे माजी कमांडर लेप्ट. जन. पी.एन. हून यांनी केला आहे.तत्कालीन लष्करप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी व उपलष्करप्रमुख लेप्ट. जन. एस.एफ. रॉड्रिग्ज यांचाही या कटात सहभाग होता, असेही ८६वर्षीय हून यांनी नुकत्याच प्रकाशित ‘द अनटोल्ड ट्रुथ’ या पुस्तकात नमूद केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजीव गांधी यांच्याशी सख्य नसलेल्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी हा कट रचताना लष्कराला हाताशी धरले होते. १९८७मध्ये पंजाबचे तत्कालीन राज्यपाल सिद्धार्थ शंकर रे यांनी चंदीगडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्यानी झैलसिंग यांनी राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचा तसेच त्यांना १९८४च्या शीख दंगलीतील पीडितांची चिंता नसल्याचा आरोप केला होता.हून हे वेस्टर्न कमांडचे प्रमुख असताना मे-जून १९८७मध्ये कार्यालयीन कामासाठी दिल्लीत गेले असता त्यांना बटालियन मूव्ह करण्याबाबत संदेश मिळाला होता. लष्कराच्या मुख्यालयाला तीन पॅरा-कमांडो बटालियन हलविण्याबाबत पत्र पाठविण्यात आल्याची माहिती त्यात होती. पश्चिम कमांडच्या अंतर्गत असलेली पहिली तसेच उत्तर आणि दक्षिण कमांडच्या नवव्या आणि दहाव्या बटालियनला दिल्लीत कूच करण्याचा तो आदेश होता. विशेष दलांची मागणी करण्यात आल्याबाबत मी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे प्रधान सचिव गोपी अरोरा यांना घडामोडींची माहिती दिली. या बटालियन रॉड्रिग्ज यांच्या नियंत्रणाखाली ठेवल्या जाणार होत्या. देशासाठीच नव्हे तर राजकीय यंत्रणेला हादरा देणारा असा हा आदेश असल्याची कल्पना मला होती. मी त्यावेळी दिल्ली एरिया कमांडरला माझ्या आदेशाखेरीज सैन्य हलवू नका, असा आदेश देत ही मोहीम यशस्वी होऊ दिली नाही, असा दावाही हून यांनी या पुस्तकात केला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)———————————————-लष्करी राजवटीची भीतीहून हे आॅक्टोबर १९८७ मध्ये निवृत्त झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री विद्याचरण शुक्ला यांंना लष्कराच्या हालचालींची माहिती होती, असे हून यांनी त्यांच्या पुस्तकात ‘ ग्यानी झैलसिंग विरुद्ध राजीव गांधी’ या दहाव्या प्रकरणात म्हटले आहे. त्यावेळी शुक्ला हे चांदमिनार येथे खास माझी भेट घेण्यासाठी आले होते. राजीव गांधी यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यास लष्कराच्या हाती सत्ता सोपविली जाण्याची भीती तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना होती, असेही हून यांनी म्हटले. अनेक युद्धांत सहभागाचा अनुभव असलेले ९४ वर्षीय एअर मार्शल रणधीरसिंग यांनी मात्र हून यांच्या दाव्याला छेद दिला आहे. लष्करी उठावाचा कोणताही प्रयत्न कधीही झाला नाही. भारतीय जवानांना दिले जात असलेले पारंपरिक प्रशिक्षण त्या स्वरूपाचे नाही, असेही त्यांनी नमूद केले.