शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

रजनीकांत घेऊ शकतात मोदींची भेट! तामिळनाडूच्या राजकारणात रंगत

By admin | Updated: May 21, 2017 16:40 IST

राज्यव्यापी लोकप्रियता असलेल्या नेतृत्वाची तामिळनाडूमध्ये वानवा निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात

ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. 21 - तामिळनाडूच्या राजकारणात सध्या नव्या बदलाचे वारे वाहत आहेत. जयललितांचा आकस्मिक मृत्यू आणि एम. करुणांनिधींच्या वार्धक्यामुळे राज्यव्यापी लोकप्रियता असलेल्या नेतृत्वाची तामिळनाडूमध्ये वानवा निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यातच रजनीकांत यांनी स्वत: ही आपली पावले राजकारणाच्या दिशेने वळवण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची वदंता आहे. 
 
रजनीकांत यांच्या दक्षिणेतील कमालीच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वारंवार वर्तवण्यात येत असते. दरम्यान, आज नवभारत टाइम्स या हिंदी संकेतस्थळाने मोदी आणि रजनीकांत यांच्या संभाव्य भेटीचे वृत्त दिले आहे. गेल्या आठवड्यात  चाहत्यांशी संवाद साधतांना रजनीकांत यांनी त्यांना मोठ्या लढ्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन  रजनी यांच्या राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचे संकेत मानले जात आहे.  मी पक्का तामिळीच आहे. जर तामिळी लोकांनी स्वीकारले नाही तर मी थेट हिमालयात जाईन, असे रजनीकांत यांनी म्हटले होते. 
 
( रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी: सुब्रमण्यम स्वामी )
 
दक्षिणेतील राजकारणात फिल्मी कलाकारांचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. तेथे अनेक कलाकारांनी सामान्य कलाकार ते अव्वल राजकारणी अशी झेप घेतली आहे. नुकत्याच दिवंगत झालेल्या माजी मुख्यमंत्री जयललिता आणि ज्येष्ठ नेते करुणानिधी यांनीही राजकारणात उतरण्यापूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावले होते.