शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोरीमुळे 'राजस्थान की रानी तेरी खैर नही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 06:21 IST

अनेकांचे बंड : एकछत्री कारभारामुळे वसुंधराराजेंविषयी नाराजी

सुहास शेलारजयपूर : पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केलेली बंडखोरी, एकछत्री कारभारामुळे स्वपक्षीयांची नाराजी, विरोधकांचा हल्लाबोल आणि निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी काँग्रेसला बहुमत मिळण्याचा वर्तवलेला अंदाज पाहता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यासाठी ‘रानी तेरी खैर नहीं’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

राजस्थानमध्ये २०१३ साली भाजपाने २०० पैकी १६३ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली. वसुंधराराजे मुख्यमंत्री झाल्या. मात्र सत्तेच्या किल्ल्या हाती येताच त्यांनी एकछत्री कारभार सुरू केला. मंत्रिमंडळ होते, पण ते नावापुरतेच. राजेंच्या संमतीशिवाय इथे ‘पत्ता’ देखील हलत नव्हता. त्यामुळे पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. पक्षातील ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांनी फारकत घेतली भारत वाहिनी पक्ष स्थापन केला. त्यानंतर भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी असलेल्या जसवंतसिंह यांचे पुत्र आ. मानवेंद्रसिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता भाजपचे नेते हनुमान बेनिवाल यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा भाजपाला निवडणूकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी-अमित शाह यांना जुमानत नसल्याने वसुंधराराजेंवर भाजपाची केंद्रीय कार्यकारिणीही नाखूश आहे. त्यामुळे उमेदवार निवडण्याचे थेट अधिकार वसुंधराराजेंकडे न देता निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांच्या देखरेखीखाली १५ ज्येष्ठ नेत्यांची टीम तयार केली होती. या टीमने जिल्हावार प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटून अहवाल तयार केला होता.

एका मतदारसंघातून केवळ एका उमेदवाराची निवड न करता दोन ते तीन उमेदवारांची नावे यादीत समाविष्ट केली होती. त्यानंतर सोमवारी भाजपाने १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात २५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, विद्यमान ८५ आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानमधील एकंदरीत स्थिती पाहता वसुंधराराजे यांची वाट बिकट असल्याचेच चित्र आहे. राजस्थानात ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ११ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.पद्मावत चित्रपटाचा परिणाममानवेंद्रसिंह यांनी ‘कमल का फूल, मेरी भूल’ असा नारा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजपुतांची मते काँग्रेसकडे वळतील, अशी आशा काँग्रेसला आहे. पद्मावत प्रकरणात वसुंधराराजे सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे हा समाज ‘राजे’ सरकारवर नाराज आहे. पश्चिम राजस्थानातील जवळपास ५३ मतदारसंघांत राजपूत समाजाचा मोठा प्रभाव आहे. या मतांच्या जोरावर काँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे निष्कर्ष आल्याने भाजपा जपून पावले टाकत आहे. त्याचा फायदा घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट व ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी भाजपाला घेरण्यास सुरवात केली आहे.सर्वेक्षणातील अंदाजकाँग्रेस भाजपा बसपा इतरटाइम्स नाऊ-सीएनएक्स ११० ते १२० ७० ते ८० १ ते ३ ७ ते ९इंडिया टीव्ही-सीएनएक्स ११५ ७५ २ ८आज तक १३० ५७ - १३एबीपी - सी व्होटर्स १४२ ५६ - २

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा