शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 14:23 IST

४०हून अधिक देशांतील कलावंत एकाच व्यासपाठीवर

मुंबई: जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा रस्ता कापून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्या रसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे आणि कलेची देवाण-घेवाण व्हावी, या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थारच्या वाळवंटात रंगणार आहे. २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ४० हून अधिक देशांतील हजारो कलावंत सहभागी होणार आहेत.अत्युत्तम आणि दर्जेदार संगीताचा सर्वोत्तम अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवावा हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यंदा महोत्सवात कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी मोरियो (मोर), बिराखा (पाऊस) आणि अम्मारा (तारा) असे तीन भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय ४०हून अधिक लाइव्ह कला प्रकार सादर केले जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद अशा शहरांतून सहभागी होणाऱ्या रसिकांची सशुल्क प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.विशेष म्हणजे जगभरातून येणाऱ्या हजारो कलावंतांची राहण्याची सोय थारच्या वाळवंटातच केली जाणार आहे. यासाठी तीन आकाराचे तंबू उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या तंबूसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सुर्याद्यपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात सुर्यास्थानंतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम चित्रपट रसिकांना मोकळ्या आकाशालाखाली पाहता येणार आहेत.याशिवाय वाळूच्या ढिगाऱ्यावरून रोलिंग डाऊन, ४० फुट उंचीचा सी-सॉ, विविध कार्यशाळा आणि नक्षत्रदर्शनची सफर असा भरगच्च कार्यक्रम रसिकांना आनंद लुटता येणार आहे. या महोत्सवादरम्यान हार्ले डेव्हिडसनवरून बाईक राइड करता येणार आहे. वाळवंटात कुठेही अस्वच्छता होऊ नये यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात येणार आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे स्थानिक जीवन विस्कळित होऊ नये म्हणून आयोजकांकडून एकूण ८७ हजार लीटर पाणी आणि ५ हजार लीटर चहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.वाळवंटात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य अतिशय प्रेरणादायी आहे. प्रचंड कष्ट आणि डोक्यावर तळपणारा सुर्य यामुळे लोकांचा कस पणाला लागतो. यात त्यात इथल्या लोकांचे मनोधैर्य उंचावते, याकरताच इथे महोत्सव आयोजित केला असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

टॅग्स :entertainmentकरमणूक