शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 14:23 IST

४०हून अधिक देशांतील कलावंत एकाच व्यासपाठीवर

मुंबई: जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा रस्ता कापून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्या रसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे आणि कलेची देवाण-घेवाण व्हावी, या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थारच्या वाळवंटात रंगणार आहे. २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ४० हून अधिक देशांतील हजारो कलावंत सहभागी होणार आहेत.अत्युत्तम आणि दर्जेदार संगीताचा सर्वोत्तम अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवावा हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यंदा महोत्सवात कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी मोरियो (मोर), बिराखा (पाऊस) आणि अम्मारा (तारा) असे तीन भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय ४०हून अधिक लाइव्ह कला प्रकार सादर केले जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद अशा शहरांतून सहभागी होणाऱ्या रसिकांची सशुल्क प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.विशेष म्हणजे जगभरातून येणाऱ्या हजारो कलावंतांची राहण्याची सोय थारच्या वाळवंटातच केली जाणार आहे. यासाठी तीन आकाराचे तंबू उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या तंबूसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सुर्याद्यपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात सुर्यास्थानंतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम चित्रपट रसिकांना मोकळ्या आकाशालाखाली पाहता येणार आहेत.याशिवाय वाळूच्या ढिगाऱ्यावरून रोलिंग डाऊन, ४० फुट उंचीचा सी-सॉ, विविध कार्यशाळा आणि नक्षत्रदर्शनची सफर असा भरगच्च कार्यक्रम रसिकांना आनंद लुटता येणार आहे. या महोत्सवादरम्यान हार्ले डेव्हिडसनवरून बाईक राइड करता येणार आहे. वाळवंटात कुठेही अस्वच्छता होऊ नये यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात येणार आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे स्थानिक जीवन विस्कळित होऊ नये म्हणून आयोजकांकडून एकूण ८७ हजार लीटर पाणी आणि ५ हजार लीटर चहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.वाळवंटात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य अतिशय प्रेरणादायी आहे. प्रचंड कष्ट आणि डोक्यावर तळपणारा सुर्य यामुळे लोकांचा कस पणाला लागतो. यात त्यात इथल्या लोकांचे मनोधैर्य उंचावते, याकरताच इथे महोत्सव आयोजित केला असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

टॅग्स :entertainmentकरमणूक