शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

दुष्काळात IPL सामने खेळवण्यावरुन राजस्थान उच्च न्यायालयाने दर्शवली नाराजी

By admin | Updated: April 21, 2016 12:58 IST

राजस्थानमध्ये पाण्याची समस्या असताना आयपीएल सामने महाराष्ट्रातून हलवून जयपूरमध्ये का खेळवले जावेत ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
राजस्थान, दि. २१ - राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने खेळवण्यावरुन राजस्थान उच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली आहे. राजस्थानमध्ये पाण्याची समस्या असताना आयपीएल सामने महाराष्ट्रातून हलवून जयपूरमध्ये का खेळवले जावेत ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नोटीस पाठवली आहे. 
 
राज्य सरकार आणि बीसीसीआय यांच्याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पीएचईडी), जलसंपदा विभाग, क्रिडा व युवा विभाग आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनला नोटीस पाठवण्यात आली आहे. आयपीएल सामने जयपूरमध्ये खेळवण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने भरवण्यामागचं कारण काय ? अशी विचारणा राजस्थान उच्च न्यायालयाने केली आहे. राजस्थान सरकारला 27 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयात बुधवारी आयपीएल सामने खेळवण्यावरुन जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.