शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

अरे देवा! "ना लग्न करुन देत, ना..."; घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 15:22 IST

कुटुंबीयांवर नाराज असलेली मुलगी थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील मथुरा गेट पोलीस स्टेशन परिसरात कुटुंबीयांवर नाराज असलेली मुलगी थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे ४५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी समजावून सांगितल्यावर मुलीला टाकीवरून खाली उतरवण्यात यश आलं आहे. 

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे कुटुंबीय तिला शिक्षण घेऊन देत नाहीत आणि तिला शिवीगाळ करतात. त्यामुळे ती पाण्याच्या टाकीवर चढली. सध्या पोलीस मुलीची चौकशी करत आहेत. मथुरा गेट पोलीस स्टेशनचे अधिकारी करण सिंह राठोड यांनी सांगितलं की, मनी असं मुलीचं नाव असून तिने आई-वडील त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. 

मुलीला बीएड करायचे आहे, पण कुटुंबीय तिच्या शिक्षणासाठी पैसे देत नाहीत. तसेच ते तिचं लग्नही लावून देत नाहीत. त्यामुळे घरच्यांचा राग अनावर होऊन ती पाण्याच्या टाकीवर चढली. त्यानंतर ४५ मिनिटांच्या समुपदेशनानंतर मुलगी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरली.

मुलीने सांगितलं की, कुटुंबीय तिला काही ना काही कारणाने त्रास देतात. ते म्हणतात तू मरून जा, मी लग्न केलेलं नाही. मला माझ्या कुटुंबाकडून स्वातंत्र्य हवं आहे. मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. माझे वडील रणवीर सिंह सैन्यातून निवृत्त झाले आहेत आणि त्यांना एक लहान बहीण आणि एक लहान भाऊ आहे.

आई राजेंद्री देवी आणि वडील रणवीर सिंह यांनी मारहाण केल्याने मनीला घरी जायचं नाही. ते सध्या भरतपूर शहरातील गांधी नगर येथे राहतात. मथुरा गेटचे एसएचओ सांगतात की, मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात अद्याप कोणी आलेलं नाही. आता मुलीला सेवर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान