शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 20:00 IST

मीरा रोड येथील सभेत राज ठाकरेंनी केलेल्या विधानावरुन गुजरातमधील पाटीदार समाज आक्रमक झाला आहे.

Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषेवरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. याच वादाच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका व्यापाऱ्याला मनसैनिकांना मारहाण केली होती. त्यानंतर देशभरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसैनिकांवर टीका करण्यात आली होती. तिथल्या व्यापाऱ्यांनीही बंद पुकारुन आव्हान दिलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मीरा रोड येथे सभा घेऊन मराठीला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला. यावेळी भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख करत टीका केली. यावरुन आता गुजरातमधील राजकारण्यांनी टीका केली आहे.

मीरा रोड येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता असं म्हटलं. राज ठाकरे यांच्या विधानावर पाटीदार नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.  राज ठाकरे यांनी सरदार पटेलांचा अपमान केल्याचे म्हणत पाटीदार नेते अल्पेश कथिरिया यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी याप्रकरणी माफी मागावी अशी अल्पशे कथिरिया यांनी केली. 

राज ठाकरे भांडणे लावायचं काम करत आहेत

"राज ठाकरे हे गुजराती लोकांबद्दल आणि सरदार पटेल यांच्याविरुद्ध जाहीरपणे बोलले आहे. आता राज ठाकरे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. राज ठाकरे गुजराती आणि मराठी लोकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत मनसे अस्तित्वात नव्हती, आता ते उभे राहण्याचा प्रयत्न करताना  सरदार पटेलांचा अपमान करत आहेत. भाषेवरून आधी त्यांनी गुजराती लोकांना आणि आता मान्यवरांना लक्ष्य केले. हा केवळ गुजरातचा नाही तर संपूर्ण भारताचा अपमान आहे. सरदार साहेब आणि मोरारजी देसाई यांना लक्ष्य करणे म्हणजे तणाव पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असे राजकीय स्टंट आम्ही सहन करणार नाही," असं अल्पेश कथिरिया म्हणाले.

राज ठाकरेंनी गुजरातमध्ये पाय ठेवून दाखवावा

पाटीदार समुदायाच्या संघटनेचे प्रमुख लालजी पटेल यांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये पाऊल ठेवल्यास त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. "तुम्ही अखंड भारताच्या शिल्पकाराचा अपमान करता आणि राजकीय स्वीकृतीची अपेक्षा करता? गुजरातमध्ये या, आम्ही तुमचा पूर्ण ताकदीने विरोध करू," असे लालजी पटेल म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

"राज्यात हिंदी भाषा सक्ती करण्याच्या मागे लागलेले आहेत. केंद्र सरकार पूर्वीपासून अशा प्रकारचा दबाव आणतंय. काँग्रेसचं सरकार असल्यापासूनचं हे सर्व सुरु आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यासाठीचा जो लढा होता तो मोठा लढा होता. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव काही गुजराती व्यापाऱ्यांचा आणि गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा आचार्य अत्रेंचं पुस्तक वाचत होतो तेव्हा मला धक्का बसला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडून बोललं गेलं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्वप्रथम सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका. मोरारजी देसाई यांनी मराठी माणसावर गोळीबार केला होता. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून मानत आलो त्यांनी असं सांगितलं. आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहत आलोय. पण त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला," असं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGujaratगुजरातhindiहिंदी