शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

संसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वात यशस्वी; दोन्ही सभागृहांनी संमत केली 20 विधेयके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 14:58 IST

या अधिवेशनामध्ये 17 दिवसांच्या कामकाजात दोन्ही सभागृहांनी 20 विधेयके संमत केली.

नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन एक यशस्वी अधिवेशन म्हणून ओळखले जात आहे. गेल्या काही वर्षांचा विचार करता या अधिवेशनात चांगल्या प्रकारे आणि जास्त काम झाल्याचे दिसून आले. या अधिवेशनामध्ये 17 दिवसांच्या कामकाजात दोन्ही सभागृहांनी 20 विधेयके संमत केली. वर्ष 2000 नंतर प्रथमच एवढे कामकाज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यकाळामध्ये लोकसभेची उत्पादनशक्ती 118 टक्के तर राज्यसभेची उत्पादनशक्ती 74 टक्के इतकी होती. हे अधिवेशन सत्ताधारी रालोअासाठी सर्वात लाभदायी ठरले असे म्हणता येईल. तेलगू देसमने आणलेला अविश्वासदर्शक ठराव मोठ्या फरकाने हाणून पाडण्यात आणि राज्यसभेत उपाध्यक्षपदी आपल्याच आघाडीकडे राखण्यात त्यांना यश आले.

हे अदिवेशन म्हणजे सामाजिक न्यायाच्यादृष्टीने एखाद्या सणासारखे असल्याचे मत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले. या अधिवेशनामध्येच एससी, एसटी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रोसिटिज दुरुस्ती कायदा संमत झाला तसेच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज 18 जुलैरोजी सुरु झाले आणि शुक्रवारी 10 ऑगस्ट रोजी संपले.24 दिवसांच्या काळामध्ये 17 दिवसाचे कामकाज झाले आणि त्यात लोकसभेची उत्पादनशक्ती 118 टक्के व राज्यसभेची 74 टक्के इतकी होती असे संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितले. याच अधिवेशनामध्ये केंद्र सराकरिवरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. सरकारने हा ठराव मोठ्या फरकाने पराभूत करुन आपले सरकार भक्कम असल्याची प्रचिती विरोधकांनी दिली. लोकसभा आणि राज्यसभेत या अधिवेशनामध्ये 21 विधेयके मांडण्यात आली. लोकसभेने 21 तर राज्यसभेने 14 विधेयके मंजूर केली तर दोन्ही सभागृहांनी 20 विधेयके मंजूर केली.पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या माहितीनुसार वर्ष 2000 नंतर इतकी जास्त उत्पादनशक्ती प्रथमच दिसून आली आहे. दोन्ही सभागृहांनी कामकाजासाठी दिलेला वेळही भरपूर होता. 2004 नंतर सभागृहांनी सर्वात जास्त वेळ देण्याची ही घचना होती असेही पीआरएसने म्हटले आहे.या अधिवेशनातील 27 तासांचा कार्यकाळ आंध्र प्रदेशला विशेष दर्जाची मागणी, स्विझर्लंडमधील भारतीयांचा पैसा, जमावाद्वारे होणाऱ्या हत्या, आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन, राफेल खरेदी, देवरिया येथील आश्रयगृहातील मुलींचा छळ अशा मुद्द्यांमुळे सभागृहात केलेल्या निदर्शनांमुळे वाया गेला.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा