शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत

By प्रविण मरगळे | Updated: November 6, 2020 11:10 IST

West Bengal Local Train Update News: रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे.

ठळक मुद्देसोमवारी उभय पक्षांची पुन्हा बैठक होईल, त्याबरोबरच प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जाईल.कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईलकोरोना महामारीमुळे बंगालमध्ये लोकल ट्रेन सेवा २० मार्चपासून बंद होती.

कोलकाता – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेल्या लोकल सेवा येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. पश्चिम बंगालमध्येलोकल सेवा पूर्ववत केल्या जातील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. ११ नोव्हेंबरपासून ३६२ लोकल गाड्या रेल्वे रुळावरुन धावतील, मिळालेल्या माहितीनुसार लोकल गाड्या जुन्या टाइम टेबलनुसार धावतील.

सियालदह विभागात सर्वात जास्त गर्दी असल्याने याठिकाणी एकूण २२८ लोकल अप-डाऊन मार्गावर धावणार आहेत. हावडा विभागात १०० लोकल व उर्वरित ३४ गाड्या दक्षिण-पूर्व विभागातील खडगपूर येथून धावतील. कोरोना महामारीमुळे बंगालमध्ये लोकल ट्रेन सेवा २० मार्चपासून बंद होती. राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात २ नोव्हेंबर रोजी बैठक झाली, ज्यामध्ये पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वे १० ते १५ टक्के क्षमतेने लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर बुधवारी दोन्ही बाजूंची पुन्हा बैठक झाली आणि गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल, असे पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

सोमवारी पुन्हा होणार बैठक

सोमवारी उभय पक्षांची पुन्हा बैठक होईल, त्याबरोबरच प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जाईल. यासह गाड्यांचे वेळापत्रकदेखील प्रसिद्ध केले जाईल, यासंदर्भातील अधिसूचनाही मंगळवारी देण्यात येणार आहे.

गर्दीला नियंत्रित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची

रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. यासंदर्भात प्रत्येक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचार्‍यांची नेमणूक करावी लागेल आणि थर्मल स्क्रीनिंगचीही व्यवस्था करावी लागेल.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी महाराष्ट्राची रेल्वेला विनंती

सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी राज्य सरकारकडून रेल्वेला करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर रेल्वेकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, मात्र पश्चिम बंगालला लोकल सेवा सुरु झाली असली तर मुंबईकर अद्याप प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलlocalलोकलwest bengalपश्चिम बंगालcorona virusकोरोना वायरस बातम्या