शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत

By प्रविण मरगळे | Updated: November 6, 2020 11:10 IST

West Bengal Local Train Update News: रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे.

ठळक मुद्देसोमवारी उभय पक्षांची पुन्हा बैठक होईल, त्याबरोबरच प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जाईल.कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईलकोरोना महामारीमुळे बंगालमध्ये लोकल ट्रेन सेवा २० मार्चपासून बंद होती.

कोलकाता – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेल्या लोकल सेवा येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. पश्चिम बंगालमध्येलोकल सेवा पूर्ववत केल्या जातील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. ११ नोव्हेंबरपासून ३६२ लोकल गाड्या रेल्वे रुळावरुन धावतील, मिळालेल्या माहितीनुसार लोकल गाड्या जुन्या टाइम टेबलनुसार धावतील.

सियालदह विभागात सर्वात जास्त गर्दी असल्याने याठिकाणी एकूण २२८ लोकल अप-डाऊन मार्गावर धावणार आहेत. हावडा विभागात १०० लोकल व उर्वरित ३४ गाड्या दक्षिण-पूर्व विभागातील खडगपूर येथून धावतील. कोरोना महामारीमुळे बंगालमध्ये लोकल ट्रेन सेवा २० मार्चपासून बंद होती. राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात २ नोव्हेंबर रोजी बैठक झाली, ज्यामध्ये पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वे १० ते १५ टक्के क्षमतेने लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर बुधवारी दोन्ही बाजूंची पुन्हा बैठक झाली आणि गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल, असे पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

सोमवारी पुन्हा होणार बैठक

सोमवारी उभय पक्षांची पुन्हा बैठक होईल, त्याबरोबरच प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जाईल. यासह गाड्यांचे वेळापत्रकदेखील प्रसिद्ध केले जाईल, यासंदर्भातील अधिसूचनाही मंगळवारी देण्यात येणार आहे.

गर्दीला नियंत्रित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची

रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. यासंदर्भात प्रत्येक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचार्‍यांची नेमणूक करावी लागेल आणि थर्मल स्क्रीनिंगचीही व्यवस्था करावी लागेल.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी महाराष्ट्राची रेल्वेला विनंती

सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी राज्य सरकारकडून रेल्वेला करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर रेल्वेकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, मात्र पश्चिम बंगालला लोकल सेवा सुरु झाली असली तर मुंबईकर अद्याप प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलlocalलोकलwest bengalपश्चिम बंगालcorona virusकोरोना वायरस बातम्या