शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत

By प्रविण मरगळे | Updated: November 6, 2020 11:10 IST

West Bengal Local Train Update News: रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे.

ठळक मुद्देसोमवारी उभय पक्षांची पुन्हा बैठक होईल, त्याबरोबरच प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जाईल.कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईलकोरोना महामारीमुळे बंगालमध्ये लोकल ट्रेन सेवा २० मार्चपासून बंद होती.

कोलकाता – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेल्या लोकल सेवा येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. पश्चिम बंगालमध्येलोकल सेवा पूर्ववत केल्या जातील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. ११ नोव्हेंबरपासून ३६२ लोकल गाड्या रेल्वे रुळावरुन धावतील, मिळालेल्या माहितीनुसार लोकल गाड्या जुन्या टाइम टेबलनुसार धावतील.

सियालदह विभागात सर्वात जास्त गर्दी असल्याने याठिकाणी एकूण २२८ लोकल अप-डाऊन मार्गावर धावणार आहेत. हावडा विभागात १०० लोकल व उर्वरित ३४ गाड्या दक्षिण-पूर्व विभागातील खडगपूर येथून धावतील. कोरोना महामारीमुळे बंगालमध्ये लोकल ट्रेन सेवा २० मार्चपासून बंद होती. राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात २ नोव्हेंबर रोजी बैठक झाली, ज्यामध्ये पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वे १० ते १५ टक्के क्षमतेने लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर बुधवारी दोन्ही बाजूंची पुन्हा बैठक झाली आणि गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल, असे पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

सोमवारी पुन्हा होणार बैठक

सोमवारी उभय पक्षांची पुन्हा बैठक होईल, त्याबरोबरच प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जाईल. यासह गाड्यांचे वेळापत्रकदेखील प्रसिद्ध केले जाईल, यासंदर्भातील अधिसूचनाही मंगळवारी देण्यात येणार आहे.

गर्दीला नियंत्रित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची

रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. यासंदर्भात प्रत्येक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचार्‍यांची नेमणूक करावी लागेल आणि थर्मल स्क्रीनिंगचीही व्यवस्था करावी लागेल.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी महाराष्ट्राची रेल्वेला विनंती

सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी राज्य सरकारकडून रेल्वेला करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर रेल्वेकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, मात्र पश्चिम बंगालला लोकल सेवा सुरु झाली असली तर मुंबईकर अद्याप प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलlocalलोकलwest bengalपश्चिम बंगालcorona virusकोरोना वायरस बातम्या