शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रेल्वेत थुंकण्याच्या समस्येवर 'आयडियाची कल्पना', पिचकाऱ्या मारणाऱ्यांसाठी आणलं खास 'पाऊच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 16:30 IST

थुंकण्याच्या समस्येवर रेल्वेनं शोधला भन्नाट उपाय; नागपूरमधील स्टार्टअप कंपनीला कंत्राट

नवी दिल्ली: देशभरात स्वच्छता अभियान राबवूनही लोकांची मानसिकता बदलत नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवा, असं आवाहन सरकारकडून करण्यात येतं. मात्र रस्त्यांपासून रेल्वेपर्यंत सगळीकडेच कचरा टाकला जातो. पान, तंबाखूच्या पिचकाऱ्या मारल्या जातात. यामुळे परिसर अस्वच्छ तर होतोच, त्यासोबतच आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होतात. भारतीय रेल्वे गुटख्यामुळे होणारी घाण स्वच्छ करण्यासाठी वर्षाकाठी जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करते. रेल्वे गाड्या आणि स्थानकं स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी लाखो लीटर पाणीदेखील वापरण्यात येतं.

अनेक आवाहनं, विनंत्या करूनही प्रवासी रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये थुंकणं बंद करत नाहीत. अशा लोकांसाठी आता रेल्वेनं नवा उपाय शोधला आहे. रेल्वे स्पिटून (पिकदाणी), कियोस्क लावण्याच्या तयारीत आहे. याठिकाणाहून प्रवासी स्पिटून पाऊच खरेदी करू शकतात. त्याची किंमत ५ ते १० रुपये असेल. सुरुवातीला देशात ४२ स्थानकांमध्ये अशा प्रकारचे स्टॉल सुरू करण्याची योजना आहे.

रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि उत्तर विभागानं नागपुरातल्या ईझीस्पिट या स्टार्टअपला स्पिटून पाऊचच्या निर्मितीचं कंत्राट दिलं आहे. या पीकदाणीला प्रवासी सहज आपल्या खिशात ठेऊ शकतात. यामध्ये प्रवासी थुंकू शकतात. या बायोडिग्रेडेबल पाऊचचा वापर १५ ते २० वेळा करता येऊ शकेल. संपूर्ण वापर झाल्यावर पाऊच मातीत टाकता येईल. हे पाऊच मातीत पूर्णपणे मिसळेल. त्यामुळे प्रदूषणाची समस्या उद्भवणार नाही.

नागपूरस्थित ईझीस्पिट या स्टार्टअपनं रेल्वे स्थानकांवर वेंडिंग मशीन्स लावण्यात आल्या आहेत. या कंपनीसोबत नागपूर आणि औरंगाबाद महानगरपालिकेनं करार केला आहे. 'आम्ही मध्य, उत्तर आणि पश्चिम रेल्वेच्या ४२ स्थानकांसाठी भारतीय रेल्वेसोबत करार केला आहे. काही स्थानकांवर ईजीस्पिट वेंडिंग मशीन्स लावण्यात सुरुवात केली आहे,' अशी माहिती ईझीस्पिटच्या सहमालक रितू मल्होत्रा यांनी सांगितलं. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे