शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उद्ध्वस्त केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 03:36 IST

फसवणुकासाठी ३ हजार ५५४ आयआरसीटीसी ग्राहकांचा आयडी वापरण्यात आला. त्यामुळे वापरकर्त्यांनी आयडीचा वापर करताना सुरक्षितता बाळगावी.

नवी दिल्ली : बंगळुरूमध्ये बनावट तिकिट विक्री करणारे रॅकेटच रेल्वे मंत्रालयाने उद्ध्वस्त केले आहे. श्रीरंग बारणे यांनी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर झालेल्या कारवाईची माहिती विचारली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या उत्तरानुसार बंगळुरूत ८२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काही बँक खात्यांची नोंद त्यांच्या डायरीत आढळली. रेल्वे तिकिटांचा काळाबाजर रोखण्यासाठी प्रशासनाने गतवर्षी आॅपरेशन थंडर राबवले. ज्यात ४६२ शहरांमध्ये छाननी झाली. खोट्या तिकिटांच्या ५६३ तक्रारींची नोंद या काळात झाली. .हे मोठे रॅकेटच आहे. फसवणुकासाठी ३ हजार ५५४ आयआरसीटीसी ग्राहकांचा आयडी वापरण्यात आला. त्यामुळे वापरकर्त्यांनी आयडीचा वापर करताना सुरक्षितता बाळगावी.>एफडीआयमध्ये ८२ हजार दशलक्ष डॉलर्सगेल्या चार वर्षातील थेट परकीय गुंतवणूकीची माहिती अरविंद सावंत यांनी मागितली. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २ लाख ८३ हजार ९२ दशलक्ष डॉलर्स गंतवणूक एफडीआयमध्ये झाली. सन २०१४-१५ मध्ये ४५१४८, २०१५-१६ मध्ये ५५५५९, २०१६-१७ साली ६०२२०, २०१७ ते १८ दरम्यान ६०९७५ तर चालू वित्त वर्षात आतापर्यंत ६२ हजार दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक एफडीआयमध्ये झाली आहे.वेस्टर्न कोलफिल्डचे उत्खननवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कंपनीने २२४४ टन कोळश्याचे चालू वर्षात उत्खनन केल्याचे केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. कृपाल तुमाने यांनी लेखी प्रश्न त्यासाठी विचारला होता. खासगी कंपन्यांनी किती कोळश्याचे उत्खनन केले, याची माहिती नसल्याचे मंत्र्यांनी उत्तरात नोंदवले आहे.>खनिज उद्योगासाठी प्रस्तावच नाहीमहाराष्ट्राने अद्याप खनिज उत्खनन उद्योगाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.बाळू धानोरकर यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. महाराष्ट्रासह काही राज्यांमधील खाण उत्खनन उद्योगाच्या पुनरूज्जीवनासाठी हा प्रश्न होता. मात्र त्याचे उत्तर नकारात्मक आले आहे.>रेल्वेचे खासगीकरण नाहीप्रतापराव चिखलीकर यांच्या प्रश्नावर रेल्वेचे खासगीकरण होणार नसल्याचा पुनरूच्चार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला. खासगीकरण होणार नाही. मात्र २०१८ ते २०३० दरम्यान रेल्वेचा विस्तार, आधुनिकीकरणासाठी ५० लाख कोटी रूपयांचे भांडवल लागेल. हे भांडवल उभे करण्याची योजना तयार आहे, असे ते म्हणाले.>मोबाइल्सची निर्मितीमेक इन इंडियाया महत्त्वाकांक्षी योजनेत २०२५ पर्यंत भारतात ६० कोटी मोबाइल संच तयार करू, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सुनील तटकरे यांनी मेक इन इंडियात इलेक्ट्रॉनिक हर्डवेअर उत्पादनांच्या निर्मितीवर प्रश्न विचारला होता. केंद्र सरकारने म्हटले की, आतापर्यंत मेक इन इंडियासाठी २६ लाख कोटींची तरतूद आहे.इनोव्हेशन यादीत भारत ४२ वायूएस चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरच्या यादीत भारताचे स्थान सुधारल्याचा दावा सरकारने श्रीनिवास पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात केला. ५३ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ४२ वा आहे. अर्थात भारत या यादीत नेहमी तळात असे. २०१२ साली भारत ११ देशांच्या यादीत शेवटी होता.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल