शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Railway Rules: रेल्वेचे 'हे' नियम जाणून घ्या; लांबच्या प्रवासात कधीच येणार नाही काही अडचण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 19:07 IST

Railway Rules: प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असायला हवी.

Railway Enquiry: भारतात दररोज रेल्वेने लाखो-करोडो लोक प्रवास करतात. या महागाईच्या काळात प्रवास करण्यासाठी रेल्वे हे एकमेव सुरक्षित आणि किफायतशीर साधन आहे. पण, अनेकदा असे घडते की, लोकांची तिकीटं कन्फर्म होत नाहीत, किंवा कन्फर्म तिकीट असूनही त्यांना काही ना काही त्रास होतो. 

अशा त्रासामुळे त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा दोन नियमाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुखाचा जाईल. प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. त्यांची माहिती नसल्याने प्रवाशांना अनेकदा अडचणीतून जावे लागते. भारतीय रेल्वेने देशभरात चालवल्या जाणाऱ्या बहुतांश गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. यामध्ये प्रवाशांना रात्रीही प्रवास करावा लागतो.

हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे

प्रवाशांना सर्वात जास्त त्रास होतो जेव्हा ते झोपलेले असतात आणि टीटी उठवून तिकीट तपासू लागतो. पण तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की रेल्वेच्या नियमांनुसार, TT तुम्हाला तिकीट तपासण्यासाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत उठवू शकत नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला असेल, तर त्यांना हा नियम लागू होत नाही. 

मधल्या बर्थमुळे इतरांना त्रासप्रवासादरम्यान मधोमध बर्थ असलेल्या प्रवाशांचीही मोठी अडचण होते. मधल्या बर्थच्या प्रवाशाने सीट उघडल्यास इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना बसायला त्रास होतो. पण रेल्वेच्या नियमानुसार मिडल बर्थचा प्रवासी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेतच मधली बर्थ उघडू शकतो. इतरवेळी प्रवाशाने बर्थ उघडला तर त्याची तक्रार रेल्वेकडे केली जाऊ शकते. सहप्रवासी रात्री 9 वाजल्यानंतर मधला बर्थ उघडण्यास नकार देत असतील तरही तुम्ही रेल्वेकडे तक्रार करू शकता.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे