शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Railway Rules: रेल्वेचे 'हे' नियम जाणून घ्या; लांबच्या प्रवासात कधीच येणार नाही काही अडचण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 19:07 IST

Railway Rules: प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असायला हवी.

Railway Enquiry: भारतात दररोज रेल्वेने लाखो-करोडो लोक प्रवास करतात. या महागाईच्या काळात प्रवास करण्यासाठी रेल्वे हे एकमेव सुरक्षित आणि किफायतशीर साधन आहे. पण, अनेकदा असे घडते की, लोकांची तिकीटं कन्फर्म होत नाहीत, किंवा कन्फर्म तिकीट असूनही त्यांना काही ना काही त्रास होतो. 

अशा त्रासामुळे त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा दोन नियमाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुखाचा जाईल. प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. त्यांची माहिती नसल्याने प्रवाशांना अनेकदा अडचणीतून जावे लागते. भारतीय रेल्वेने देशभरात चालवल्या जाणाऱ्या बहुतांश गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. यामध्ये प्रवाशांना रात्रीही प्रवास करावा लागतो.

हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे

प्रवाशांना सर्वात जास्त त्रास होतो जेव्हा ते झोपलेले असतात आणि टीटी उठवून तिकीट तपासू लागतो. पण तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की रेल्वेच्या नियमांनुसार, TT तुम्हाला तिकीट तपासण्यासाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत उठवू शकत नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला असेल, तर त्यांना हा नियम लागू होत नाही. 

मधल्या बर्थमुळे इतरांना त्रासप्रवासादरम्यान मधोमध बर्थ असलेल्या प्रवाशांचीही मोठी अडचण होते. मधल्या बर्थच्या प्रवाशाने सीट उघडल्यास इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना बसायला त्रास होतो. पण रेल्वेच्या नियमानुसार मिडल बर्थचा प्रवासी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेतच मधली बर्थ उघडू शकतो. इतरवेळी प्रवाशाने बर्थ उघडला तर त्याची तक्रार रेल्वेकडे केली जाऊ शकते. सहप्रवासी रात्री 9 वाजल्यानंतर मधला बर्थ उघडण्यास नकार देत असतील तरही तुम्ही रेल्वेकडे तक्रार करू शकता.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे