शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रेल्वे पोलीसही होणार ‘बीझी’

By admin | Updated: September 23, 2014 02:55 IST

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणूक काळात कायदा व सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवर मात्र याचा प्रचंड ताण पडणार आहे

सुशांत मोरे, मुंबई विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणूक काळात कायदा व सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवर मात्र याचा प्रचंड ताण पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानक आणि परिसरातील गुन्हेगारीला आळा घालणाऱ्या रेल्वे पोलिसांनाही निवडणुकीतील बंदोबस्ताची जबाबदारी देण्याची योजना असून, यामुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनचा पसारा हा खोपोली, कसारा आणि हार्बरचा पनवेल, उरणपर्यंत असून पश्चिम रेल्वेचा पसारा डहाणूपर्यंत आहे. या रेल्वे मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी जीआरपीकडे (गव्हर्नमेन्ट रेल्वे पोलीस) आहे. रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तसेच लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जीआरपी तैनात असतात. स्थानक आणि परिसरातील गुन्हेगारी रोखणे तसेच गुन्ह्यांचा तपास करण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. असे जवळपास ३,५00 जीआरपी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३,५00 जीआरपींपैकी जवळपास दीड हजार जीआरपींना मुंबईबाहेर बंदोबस्तासाठी जावे लागले होते. यात ८00 जीआरपींची पहिली तुकडी ३ आणि ४ एप्रिल रोजी मुंबईबाहेर पाठवण्यात आली होती, तर ७00 जीआरपींची दुसरी तुकडी तीन दिवसांनंतर पाठवण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या दोन हजार हजार रेल्वे पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी होती.यंदाही तेवढ्याच प्रमाणात रेल्वे पोलीस विधानसभेतील निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबईत आणि त्याबाहेर पाठवण्यात येतील, असे रेल्वे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले. मात्र अद्याप याबाबत निर्णय होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. जवळपास दीड हजार रेल्वे पोलीस विधानसभेच्या कामकाजासाठी जुंपल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.