शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:14 IST

महाकुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

New Delhi Railway Station Stampede: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची माहिती सभागृहात माहिती दिली. प्रयागराजमधील महाकुंभ येथे जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली होती. मात्र त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्र अश्विनी वैष्णव यांनी हा अपघात कशामुळे याचे कारण सांगितले आहे.

फेब्रुवारी महिन्यात महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत ४ मुले आणि ११ महिलांचाही मृत्यू झाला. अपघाताच्या काही दिवसांनंतर, रेल्वे संरक्षण दलाच्या अहवालात  प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला. आता १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाच्या डोक्यावर सामान पडल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे सरकारने सांगितले आहे. सामान पडल्याने प्रवासी पायऱ्यांवर पडले होते, असं मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी विचारलेल्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं. १५ फेब्रुवारीच्या दुःखद घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला असे आढळून आले आहे की प्रवाशाच्या डोक्यावरून सामान पडणे हे चेंगराचेंगरीचे मुख्य कारण होते. "प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी हजारो लोक रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. रात्री ९:१५-९:३० च्या सुमारास, प्लॅटफॉर्म १४-१५ ला जोडणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाली. एका प्रवाशाच्या डोक्यावरून एक जड वस्तू पडली, ज्यामुळे प्लॅटफॉर्म १४/१५ च्या पायऱ्यांवरील प्रवासी अडखळले. यामुळे रात्री ८.४८ वाजता तीन नंबरच्या पादचारी पुलावर हा  अपघात झाला. शवविच्छेदन तपासणीनुसार, पीडितांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला," असं वैष्णव यांनी म्हटलं. 

"गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती पण रात्री ८:१५ नंतर पादचारी पुलावर प्रवाशांची संख्या खूप वाढली. अनेक प्रवासी डोक्यावर जड सामान घेऊन जात होते, ज्यामुळे २५ फूट रुंदीच्या पादचारी पुलावर हालचाल करण्यास अडथळा येत होता," असेही सांगण्यात आलं. रेल्वेमंत्र्यांनी मार्चमध्ये लोकसभेत सांगितले होते की अपघाताच्या दिवशी रेल्वे स्थानकावर सुमारे ४९ हजार जनरल तिकिटे विकली गेली होती. ही संख्या दैनंदिन सरासरीपेक्षा १३ हजारांनी जास्त होती. तर एकाच नावाच्या दोन गाड्यांमुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला असं रेल्वे पोलिसांनी सांगितले होते. 

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीParliamentसंसदAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव