शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:14 IST

महाकुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

New Delhi Railway Station Stampede: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची माहिती सभागृहात माहिती दिली. प्रयागराजमधील महाकुंभ येथे जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली होती. मात्र त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्र अश्विनी वैष्णव यांनी हा अपघात कशामुळे याचे कारण सांगितले आहे.

फेब्रुवारी महिन्यात महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत ४ मुले आणि ११ महिलांचाही मृत्यू झाला. अपघाताच्या काही दिवसांनंतर, रेल्वे संरक्षण दलाच्या अहवालात  प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला. आता १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाच्या डोक्यावर सामान पडल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे सरकारने सांगितले आहे. सामान पडल्याने प्रवासी पायऱ्यांवर पडले होते, असं मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी विचारलेल्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं. १५ फेब्रुवारीच्या दुःखद घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला असे आढळून आले आहे की प्रवाशाच्या डोक्यावरून सामान पडणे हे चेंगराचेंगरीचे मुख्य कारण होते. "प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी हजारो लोक रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. रात्री ९:१५-९:३० च्या सुमारास, प्लॅटफॉर्म १४-१५ ला जोडणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाली. एका प्रवाशाच्या डोक्यावरून एक जड वस्तू पडली, ज्यामुळे प्लॅटफॉर्म १४/१५ च्या पायऱ्यांवरील प्रवासी अडखळले. यामुळे रात्री ८.४८ वाजता तीन नंबरच्या पादचारी पुलावर हा  अपघात झाला. शवविच्छेदन तपासणीनुसार, पीडितांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला," असं वैष्णव यांनी म्हटलं. 

"गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती पण रात्री ८:१५ नंतर पादचारी पुलावर प्रवाशांची संख्या खूप वाढली. अनेक प्रवासी डोक्यावर जड सामान घेऊन जात होते, ज्यामुळे २५ फूट रुंदीच्या पादचारी पुलावर हालचाल करण्यास अडथळा येत होता," असेही सांगण्यात आलं. रेल्वेमंत्र्यांनी मार्चमध्ये लोकसभेत सांगितले होते की अपघाताच्या दिवशी रेल्वे स्थानकावर सुमारे ४९ हजार जनरल तिकिटे विकली गेली होती. ही संख्या दैनंदिन सरासरीपेक्षा १३ हजारांनी जास्त होती. तर एकाच नावाच्या दोन गाड्यांमुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला असं रेल्वे पोलिसांनी सांगितले होते. 

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीParliamentसंसदAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव