शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:14 IST

महाकुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

New Delhi Railway Station Stampede: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची माहिती सभागृहात माहिती दिली. प्रयागराजमधील महाकुंभ येथे जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली होती. मात्र त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्र अश्विनी वैष्णव यांनी हा अपघात कशामुळे याचे कारण सांगितले आहे.

फेब्रुवारी महिन्यात महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत ४ मुले आणि ११ महिलांचाही मृत्यू झाला. अपघाताच्या काही दिवसांनंतर, रेल्वे संरक्षण दलाच्या अहवालात  प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला. आता १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाच्या डोक्यावर सामान पडल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे सरकारने सांगितले आहे. सामान पडल्याने प्रवासी पायऱ्यांवर पडले होते, असं मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी विचारलेल्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं. १५ फेब्रुवारीच्या दुःखद घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला असे आढळून आले आहे की प्रवाशाच्या डोक्यावरून सामान पडणे हे चेंगराचेंगरीचे मुख्य कारण होते. "प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी हजारो लोक रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. रात्री ९:१५-९:३० च्या सुमारास, प्लॅटफॉर्म १४-१५ ला जोडणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाली. एका प्रवाशाच्या डोक्यावरून एक जड वस्तू पडली, ज्यामुळे प्लॅटफॉर्म १४/१५ च्या पायऱ्यांवरील प्रवासी अडखळले. यामुळे रात्री ८.४८ वाजता तीन नंबरच्या पादचारी पुलावर हा  अपघात झाला. शवविच्छेदन तपासणीनुसार, पीडितांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला," असं वैष्णव यांनी म्हटलं. 

"गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती पण रात्री ८:१५ नंतर पादचारी पुलावर प्रवाशांची संख्या खूप वाढली. अनेक प्रवासी डोक्यावर जड सामान घेऊन जात होते, ज्यामुळे २५ फूट रुंदीच्या पादचारी पुलावर हालचाल करण्यास अडथळा येत होता," असेही सांगण्यात आलं. रेल्वेमंत्र्यांनी मार्चमध्ये लोकसभेत सांगितले होते की अपघाताच्या दिवशी रेल्वे स्थानकावर सुमारे ४९ हजार जनरल तिकिटे विकली गेली होती. ही संख्या दैनंदिन सरासरीपेक्षा १३ हजारांनी जास्त होती. तर एकाच नावाच्या दोन गाड्यांमुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला असं रेल्वे पोलिसांनी सांगितले होते. 

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीParliamentसंसदAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव