शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

Railway Privatization: रेल्वेचे खासगीकरण होणार की नाही? रेल्वेमंत्र्यांचे '100 टक्के' स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 20:24 IST

Indian Railway Privatization: रेल्वेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा शक्य आहेत. मात्र, अर्थव्यस्थेत रेल्वेची भागीदारी असेल त्यापूर्वी रेल्वेमध्येच सुधारणा होण्याची गरज आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

भारत पेट्रोलियम सारख्या नवरत्न कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. यामध्ये रेल्वेचे देखील खासगीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमुळे  अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करत मोठे वक्तव्य केले आहे. 

रेल्वेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा शक्य आहेत. मात्र, अर्थव्यस्थेत रेल्वेची भागीदारी असेल त्यापूर्वी रेल्वेमध्येच सुधारणा होण्याची गरज आहे. रेल्वेमध्ये अर्थव्यवस्थेला वेग देण्याची पूर्ण क्षमता असल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे. यानंतर आजतकच्या एका कार्यक्रमात त्यांनी रेल्वेचे खासगीकरण होणार की नाही, हे देखील सांगितले आहे. 

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सर्व सुविधा मिळाव्यात ही सरकारची प्राथमिकता आहे. रेल्वे स्टेशन स्थानिक संस्कृतीशी जोडलेले असेल तर ते जास्त चांगले होईल. जवळपास 40 रेल्वे स्थानकांचे डिझाईन तयार आहे. येत्या काळात ते बदल दिसतील. पंतप्रधान मोदींनी आम्हाला सांगितलेय की, अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचा विस्तार व्हावा की पुढील 50 वर्षे टिकले पाहिजे. पुढील दोन तीन वर्षांत अडीचशे ते तीनशे रेल्वे स्थानकांचा कायापालट होईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

खासगीकरण होणार की नाही...सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेला खासगी हातांमध्ये सोपविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रेल्वेचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. जगभरातील रेल्वे सरकार चालवितात, इथेही सरकारच रेल्वे चालवेल असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव