शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रेल्वेची खानपान सेवा नववर्षात महागणार , ३० ते ५० टक्के वाढीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:58 IST

नवीन वर्षात रेल्वेकडून प्रवाशांच्या खिसा हलका केला जाणार आहे. स्टेशन तसेच गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे दर ३० ते ५० टक्के वाढविण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे.

मुंबई : नवीन वर्षात रेल्वेकडून प्रवाशांच्या खिसा हलका केला जाणार आहे. स्टेशन तसेच गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे दर ३० ते ५० टक्के वाढविण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. रेल्वेकडून देशभरातील जवळपास ८०० गाड्यांमध्ये जेवणाचा विशेष डबा (पॅन्ट्री कार) लावला जातो. यासोबतच ५० कंपन्यांना विविध स्टेशन्स तसेच पॅन्ट्री कार नसलेल्या गाडीत खाद्यान्न पुरविण्याची ३०० विविध प्रकारची कंत्राटे देण्यात आली आहेत. आता मात्र जीएसटीअंतर्गत कच्च्या मालाचे दर कमी-अधिक झाल्याने खाद्यान्नाचे दर वाढविण्याची मागणी कंत्राटदारांकडून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेही त्याबाबत सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले.खाद्यान्नाची सेवा पुरविणाºया रेल्वे मंडळाच्या पर्यटन व कॅटरींग संचालनालयाची अलिकडेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सध्याचे खाद्यान्नांचे दर हे २०१२ चे आहेत. तेव्हापासून आतापर्यंत महागाई वर्षाला ६-७ टक्क्यांनी वाढत आहे. यासोबतच आता स्टेशनवरील खाद्यपदार्थांवर पाच टक्के आणि गाडीतील खाद्यपदार्थावर १८ टक्के जीएसटी लागत आहे.मात्र त्याचा समावेश प्रवाशांना देण्यात येणाºया खाद्यान्नाच्या दरात करण्यात आलेला नाही. तसेही रेल्वेचे सध्याचे खाद्यान्नाचे दर बाजारापेक्षा खूप कमी आहेत. यामुळेच जीएसटी आणि महागाई यांचा विचार करून दरांचा सुधारित तक्ता तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. २०१८ पासून हे सुधारित दर लागू केले जाऊ शकतात, असे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले.स्टेशन असो वा गाडी, दोन्ही ठिकाणी शाकाहारी न्याहरी ३० आणि मांसाहारी ३५ तर शाकाहारी जेवण ५० आणि मांसाहारी ५५ रुपये हे दर रेल्वेने निश्चित केले आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी कंत्राटदार त्यापेक्षा अधिक दर आकारतात. सोबतच खाद्यान्नांचा दर्जादेखील वाईट असतो. त्यासंबंधीच्या हजारो तक्रारी रेल्वेकडे येऊन पडतात, हे विशेष. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी