- सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे भाडेवाढ केलेली नाही.
- महिलांच्या सुरक्षेसाठी निवडक मार्गांवरील लेडीज डब्ब्यांमध्ये कॅमेरे बसवणार.
- कोकण रेल्वेवर ३ वर्षांत ५०,००० जणांना रोजगार मिळणार.
- ४०० रेल्वे स्टेशनांमध्ये वाय-फाय सेवा देणार.
- दरवर्षी अपघातांमुळे शेकडोंचा बळी घेणारी ३,४३८ मानवरहित फाटकं हद्दपार करणार, त्यासाठी लागणा-या पुलांसाठी ६,५८१ कोटी रुपयांची तरतूद.
- लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील जनरल डब्ब्यांमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा.
- बड्या १० शहरांमधील रेल्वे स्थानके सॅटेलाईट टर्मिनल बनवणार.
- जनरल डब्यांची संख्या वाढवणार.
- गाड्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा प्रवाशांना एसएमएस द्वारे कळवणार.
- प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी करणार.
- बंदरांना जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार ज्याचा महाराष्ट्रातल्या दिघीसारख्या बंदरांना फायदा. त्यासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद.
- ९ हायस्पीड कॉरीडॉर.
- १७,००० प्रसाधनगृहे बायोटॉयलेट्समध्ये बदलणार.
- रेल्वेच्या जागांच्या वापरातून सौरउर्जा निर्माण करणार.
- खासगी कंपन्यांना पुढे येऊन रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याचे आवाहन.
- कायकल्प प्रकल्प, रेल्वेचा चेहरा मोहरा संपूर्णपणे बदलण्याचा पण प्रभूंनी केला आहे. कामाची पद्धत, निर्णयक्षमता, कामाचं वातावरण आणि प्रवाशांना चांगली सेवा देणारी संस्कृती रेल्वे कर्मचा-यांमध्ये रुजवणार.
- लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार.
- रेल्वेतून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन व्हिलचेअर बुक करण्याची सुविधा देणार
- प्रवाशांसाठी १३८ ही हेल्पलाईन व सुरक्षाविषयक मदतीसाठी १८२ ही टोलफ्री सेवा.
- पूर्वोत्तर आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य.