शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेचे खासगीकरण? रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 18:32 IST

'रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे'

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढेही राहील, असे सांगत पीयूष गोयल यांनी भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

केंद्र सरकार भारतीय रेल्वेचे खासगीकरण करत नाही. मात्र, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांसोबत कमर्शियल आणि ऑन-बोर्ड सेवांसाठी आऊटसोर्सिंग करत आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. राज्यसभेत यासंदर्भातील प्रश्नाचे उत्तर देताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, "भारतीय रेल्वेसाठी पुढील 12 वर्षांत अंदाजे स्वरुपात 50 लाख कोटी रुपयांचा निधी सरकार जमा करू शकणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे पाऊले उचलली जात आहेत. आमचे उद्दिष्ट प्रवाशांना चांगल्या सेवा आणि फायदा देण्याचे आहे. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे नाही. भारतीय रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढे सुद्धा राहील."

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून यावर उपाय म्हणून हजारो नवीन ट्रेन आणि जास्तीत जास्त गुंतवणूक यांचा उल्लेख करत पीयूष गोयल म्हणाले, '"जर खासगी कंपन्या रेल्वेत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतील आणि सध्याची प्रणाली चालू ठेवतील तर यामध्ये ग्राहक आणि प्रवाशांना फायदाच होईल."  

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे