शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

भारतीय रेल्वेचे खासगीकरण? रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 18:32 IST

'रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे'

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढेही राहील, असे सांगत पीयूष गोयल यांनी भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

केंद्र सरकार भारतीय रेल्वेचे खासगीकरण करत नाही. मात्र, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांसोबत कमर्शियल आणि ऑन-बोर्ड सेवांसाठी आऊटसोर्सिंग करत आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. राज्यसभेत यासंदर्भातील प्रश्नाचे उत्तर देताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, "भारतीय रेल्वेसाठी पुढील 12 वर्षांत अंदाजे स्वरुपात 50 लाख कोटी रुपयांचा निधी सरकार जमा करू शकणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे पाऊले उचलली जात आहेत. आमचे उद्दिष्ट प्रवाशांना चांगल्या सेवा आणि फायदा देण्याचे आहे. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे नाही. भारतीय रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढे सुद्धा राहील."

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून यावर उपाय म्हणून हजारो नवीन ट्रेन आणि जास्तीत जास्त गुंतवणूक यांचा उल्लेख करत पीयूष गोयल म्हणाले, '"जर खासगी कंपन्या रेल्वेत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतील आणि सध्याची प्रणाली चालू ठेवतील तर यामध्ये ग्राहक आणि प्रवाशांना फायदाच होईल."  

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे