शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

भारतीय रेल्वेचे खासगीकरण? रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 18:32 IST

'रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे'

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढेही राहील, असे सांगत पीयूष गोयल यांनी भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

केंद्र सरकार भारतीय रेल्वेचे खासगीकरण करत नाही. मात्र, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांसोबत कमर्शियल आणि ऑन-बोर्ड सेवांसाठी आऊटसोर्सिंग करत आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. राज्यसभेत यासंदर्भातील प्रश्नाचे उत्तर देताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, "भारतीय रेल्वेसाठी पुढील 12 वर्षांत अंदाजे स्वरुपात 50 लाख कोटी रुपयांचा निधी सरकार जमा करू शकणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे पाऊले उचलली जात आहेत. आमचे उद्दिष्ट प्रवाशांना चांगल्या सेवा आणि फायदा देण्याचे आहे. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे नाही. भारतीय रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढे सुद्धा राहील."

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून यावर उपाय म्हणून हजारो नवीन ट्रेन आणि जास्तीत जास्त गुंतवणूक यांचा उल्लेख करत पीयूष गोयल म्हणाले, '"जर खासगी कंपन्या रेल्वेत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतील आणि सध्याची प्रणाली चालू ठेवतील तर यामध्ये ग्राहक आणि प्रवाशांना फायदाच होईल."  

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे