शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

लखनऊत मोदींच्या रॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट ?

By admin | Updated: January 2, 2017 11:16 IST

शनिवारी कानपूरमधील मंधना येथे काही अज्ञात लोकांनी रेल्वे रुळ कापण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 2 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परिवर्तन महारॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट रचला गेला होता का ? 20 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदींच्या आग्रामध्ये झालेल्या रॅलीआधी कानपूरजवळील पुखराया येथे झालेला रेल्वे अपघात कोणत्या कटाचा भाग होता का ? असे सवाल सध्या सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. शनिवारी कानपूरमधील मंधना येथे काही अज्ञात लोकांनी रेल्वे रुळ कापण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर सोशल मीडियावर हे प्रश्न विचारले जात आहेत. स्वत: केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यामागे कट असल्याची शंका असल्याचं मान्य केलं आहे. सुरेश प्रभूंनी एका ट्विटला रिट्विट केलं होतं ज्यामध्ये कट असल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती.
 
रविवारी रात्री अंकुर सिंग नावाच्या व्यक्तीने हे ट्विट केलं होतं. 'लखनऊत मोदींच्या रॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट होता. गेल्या वेळी झालेला रेल्वे अपघातही मोदींचा कार्यक्रम सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच झाला होता,' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. सुरेश प्रभू यांनी हे ट्विट रिट्विट केलं असल्याने रेल्वे मंत्रालयही कट असल्याची शंका मान्य करत असल्याचं मानलं जात आहे. याअगोदर कानपूरचे खासदार मुरली मनोहर जोशी यांनीदेखील पुखरायामधील रेल्वे अपघात कटाचा भाग असल्याचं म्हटलं होतं. 
 
शनिवारी कानपूरजवळील मंधना येथे काही अज्ञात लोकांनी रुळ कापण्याचा प्रयत्न केल्यानंतर धावाधाव सुरु झाली होती. गस्त पथक वेळेवर पोहोचल्याने या लोकांनी पळ काढला होता.
फक्त दीड महिन्यात कानपूरमध्ये दोन मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. गस्त पथकाच्या सतर्कतेमुळे अजून एक मोठा अपघात टळला. 
 
28 डिसेंबर रोजी कानपूरमधील रुरा स्टेशनजवळ रेल्वे अपघात झाला होता. यामध्ये एक्स्प्रेसचे 15 डबे रुळावरुन घसरले होते. 52 प्रवासी या अपघातात जखमी झाले होते. 20 नोव्हेंबर रोजी पुखराया येथे भीषण रेल्वे अपघात होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर प्रवासी जखमी झाले होते. त्याच दिवशी मोदींची परिवर्तन रॅली पार पडली होती. इतका मोठा अपघात होऊनदेखील मोदींनी रॅली घेतल्याने त्यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती.