शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दारूबंदीसाठी दोन मिनिटांत एक छापा, दोन वर्षांत ताशी सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:17 IST

बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात पोलिसांनी दारूचे साठे शोधण्यासाठी दर दोन मिनिटांनी एक छापा मारला आणि या गुन्ह्यांसाठी दर तासाला सात जणांना अटक केली.

पाटणा - बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात पोलिसांनी दारूचे साठे शोधण्यासाठी दर दोन मिनिटांनी एक छापा मारला आणि या गुन्ह्यांसाठी दर तासाला सात जणांना अटक केली. दारूबंदीचे धोरण यशस्वी झाले नसले तरी ते फसलेलेही नाही.या दोन वर्षांत दारूविक्री करणारे व दारू बाळगणारे अशा ९६ हजार लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दारूविक्री प्रकरणी ४ हजार लोक तुरुंगात आहेत. दारूबंदीनंतर शेजारी राज्यांतून दारू आणणे सुरू झाले. त्याला आळा घालण्यासाठी घातलेल्या छाप्यांत भारतीय बनावटीची विदेशी ब्रँडची दारू तसेच देशी दारू यांचा सुमारे २३ लाख लीटरचा साठा पोलिसांनी जप्त केला. सरकारी वाहनांतून दारूची ने-आण होत असल्याचे अनेक प्रकरणांत उघड झाले. दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आल्याने ३६१ पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईही झाली. दारूविक्री प्रकरणी पोलिसांनी ६२ हजार एफआयआर नोंदविले. दारूच्या तस्करीप्रकरणी अन्य राज्यांतील लोकांनाही अटक झाली. दारूबंदीची मागणी राज्यातील महिलांनी केली होती. दारूच्या व्यसनामुळे हिंसाचारातही वाढ झाल्याची तक्रार होती. दारू बाळगणाºया वा विक्री करणाºयाला राज्यात १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.गॅस सिलिंडरमध्ये दारूदारूबंदीमुळे गॅस सिलिंडर, वाहनाच्या चॅसिस, कारच्या लेदर पॅडिंग व चाकांच्या कव्हर्समध्ये दारूसाठा लपविण्याची क्लृप्ती लोकांनी काढली. पोलिसांनी हा डावही हाणून पाडला. गेल्या दोन वर्षांत राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण १८.५ टक्क्यांनी, तर अपघातांचे प्रमाण ३० टक्क्यांंनी कमी झाले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीBiharबिहारnewsबातम्या