शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी दोन मिनिटांत एक छापा, दोन वर्षांत ताशी सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:17 IST

बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात पोलिसांनी दारूचे साठे शोधण्यासाठी दर दोन मिनिटांनी एक छापा मारला आणि या गुन्ह्यांसाठी दर तासाला सात जणांना अटक केली.

पाटणा - बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात पोलिसांनी दारूचे साठे शोधण्यासाठी दर दोन मिनिटांनी एक छापा मारला आणि या गुन्ह्यांसाठी दर तासाला सात जणांना अटक केली. दारूबंदीचे धोरण यशस्वी झाले नसले तरी ते फसलेलेही नाही.या दोन वर्षांत दारूविक्री करणारे व दारू बाळगणारे अशा ९६ हजार लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दारूविक्री प्रकरणी ४ हजार लोक तुरुंगात आहेत. दारूबंदीनंतर शेजारी राज्यांतून दारू आणणे सुरू झाले. त्याला आळा घालण्यासाठी घातलेल्या छाप्यांत भारतीय बनावटीची विदेशी ब्रँडची दारू तसेच देशी दारू यांचा सुमारे २३ लाख लीटरचा साठा पोलिसांनी जप्त केला. सरकारी वाहनांतून दारूची ने-आण होत असल्याचे अनेक प्रकरणांत उघड झाले. दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आल्याने ३६१ पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईही झाली. दारूविक्री प्रकरणी पोलिसांनी ६२ हजार एफआयआर नोंदविले. दारूच्या तस्करीप्रकरणी अन्य राज्यांतील लोकांनाही अटक झाली. दारूबंदीची मागणी राज्यातील महिलांनी केली होती. दारूच्या व्यसनामुळे हिंसाचारातही वाढ झाल्याची तक्रार होती. दारू बाळगणाºया वा विक्री करणाºयाला राज्यात १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.गॅस सिलिंडरमध्ये दारूदारूबंदीमुळे गॅस सिलिंडर, वाहनाच्या चॅसिस, कारच्या लेदर पॅडिंग व चाकांच्या कव्हर्समध्ये दारूसाठा लपविण्याची क्लृप्ती लोकांनी काढली. पोलिसांनी हा डावही हाणून पाडला. गेल्या दोन वर्षांत राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण १८.५ टक्क्यांनी, तर अपघातांचे प्रमाण ३० टक्क्यांंनी कमी झाले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीBiharबिहारnewsबातम्या