शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

राहुल, प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये जाण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:13 IST

राज्य सरकारने परत पाठविले; काँग्रेसकडून निषेध

मेरठ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांमध्ये ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये येण्यास उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी मज्जाव केला व त्यांना परत पाठविण्यात आले. काँग्रेस सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी, प्रियांका गांधी व अन्य काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांना पोलिसांनी पारतापूर पोलीस ठाण्यानजिक अडवले. आम्हाला मेरठमध्ये येऊ न देण्याच्या आदेशाची प्रत दाखवा, अशी मागणी करूनही पोलिसांनी प्रत न दाखवता आम्हाला परत पाठवले असे राहुल गांधी यांनी सांगितले. या प्रकाराबाबत उत्तर प्रदेश सरकारवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.मेरठमध्ये संचारबंदी आहे.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या मेरठ भेटीमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास त्यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे पोलिसांनी या नेत्यांना सांगितले. त्यावर ते नेते स्वत:हून माघारी परतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिजनौरमध्ये आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांची प्रियांका गांधी यांनी रविवारी भेट घेतली. उत्तर प्रदेशात आंदोलनादरम्यान आतापर्यंत १७ जण मरण पावले आहेत.

सोनिया गांधी, ओवेसींविरोधात तक्रारनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भडक वक्तव्ये केल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, एआयएमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पत्रकार रवीशकुमार यांच्या विरोधात अ‍ॅड. प्रदीप गुप्ता यांनी उत्तर प्रदेशमधील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी