शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

राहूल किंवा प्रियांका गांधी युपीमधले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

By admin | Updated: May 2, 2016 13:41 IST

उत्तर प्रदेशमधली काँग्रेसची परिस्थिती बिकट असून ती सुधारायची असेल तर राहूल किंवा प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजक्ट करावे असे स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांचं मत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - उत्तर प्रदेशमधली काँग्रेसची परिस्थिती बिकट असून ती सुधारायची असेल तर राहूल किंवा प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजक्ट करावे असे स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांचं मत असल्याचं वृत्त आहे.
पीटीआयने दिलेल्या  वृत्तानुसार येत्या दोन आठवड्यात उत्तर प्रदेशच्या काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड उलाढाली होणार असून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही घोषित करण्यात येणार आहे. किशोर यांच्या प्रस्तावाप्रमाणे राहूल अथवा प्रियांका यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नकार दिला तर अन्य उमेदवार ब्राह्मण असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशमध्ये नाजूक आहे. पक्षामध्ये मोठे फेरफार करण्यात येणार असून 19 मे नंतर ते जाहीर करण्यात येतील असे समजते. आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरी यांचा निकाल 19 मे रोजी जाहीर होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसला पुन्हा महत्त्वाचं स्थान मिळावं यासाठी दोरणात्मक आखणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि असे समजते की, किशोर यांच्या मतानुसार पक्षाची धुरा ब्राह्मण व्यक्तिकडे देण्याची गरज आहे. 
नरेंद्र मोदींची 2014 ची लोकसभा निवडणूक आणि नितिश कुमार यांची बिहार निवडणूक यशस्वीरीत्या हाताळलेल्या किशोर यांच्याकडे काँग्रेस धोरण निश्चित करण्यासाठी आशेने बघत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या 10 ते 12 टक्के असून हा समाज भाजपाकडे वळला आहे, आणि त्याला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करावा अशी किशोर यांची व्यूहरचना दिसत आहे. चांगल्या पर्सनॅलिटिजना समोर आणण्याचा किशोर यांचा प्रयत्न असून गेल्या काही वर्षांमधले काँग्रेसचे लोकप्रिय नेते आणि जुने राजकारणी, मंत्री कदाचित पुढेआणले जातील आणि त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात येईल अशी शक्यता आहे. 
मुलायम सिंग यादव आणि मायावती या नेत्यांचा करीश्मा उत्तर प्रदेशमध्ये असून त्यांच्या मतदारांचा आधार जवळपास निश्चित आहे, जो भेदणे काँग्रेसला कठीण आहे. तर जवळपास तीन दशके उत्तर प्रदेशमधल्या सत्ताकेंद्रापासून बाहेर फेकले गेलेल्या काँग्रेसला हक्काचा मतदार नाही, ही मोठ समस्या आज पक्षापुढे आहे.