शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला राहुल जबाबदार नाहीत - काँग्रेसची स्पष्टोक्ती

By admin | Updated: May 20, 2016 09:15 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाच्या सूचना गुरुवारी पक्षातर्फे फेटाळण्यात आल्या

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाच्या सूचना गुरुवारी पक्षातर्फे फेटाळण्यात आल्या. सोबतच पक्षाने गांधींभोवतीचे सुरक्षा कवच अधिक मजबूत केले.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सरचिटणीस मुकुल वासनिक आणि प्रवक्ता आरपीएन सिंग यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रत्येक निवडणुकीचे आपले वेगळे मुद्दे असतात. आम्ही एखाद्या ठरावीक व्यक्तीच्या संदर्भातून मग ते तरुण गोगोई असोत वा ओमन चंडी राज्याच्या निवडणुकांकडे बघत नाही. कुठे सुधारणोची गरज आहे यावर आम्ही सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करू. सोनिया आणि राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचप्रमाणो या वेळीसुद्धा राहुल यांनी जबाबदारी स्वीकारू नये काय, असा सवाल करण्यात आला असता ही अयोग्य सूचना आम्ही फेटाळून लावतो, असे काँग्रेसचे नेते म्हणाले. काँग्रेस आसाममध्ये 15 वर्षे आणि केरळात गेली पाच वर्षे सत्तेत राहिली आणि सक्षम नेतृत्व दिले याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले. 
निवडणुकीतील पराभवानंतर प्रियंका गांधी संघटनेत अधिक मोठी भूमिका वठविणार काय, हा प्रश्न अप्रासंगिक असल्याचे सांगून त्यांनी फेटाळला. तर पक्षाला आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, हे वासनिक यांनी मान्य केले. तामिळनाडू, केरळ आणि पुडुच्चेरीत पक्षाचे प्रभारी असलेले वासनिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, या राज्यांमधील पराभवाची कारणो त्वरित सांगणो शक्य नाही.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवास कॉँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. कॉँग्रेसच्या दृष्टीने ही चिंतेची गोष्ट असली तरी काँग्रेस पक्ष यातूनही ङोप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
कठोर मेहनत करत राहणार
- राहुल गांधी
काँग्रेसशासित आसाम आणि केरळमध्ये पक्षाचा पराभव आणि पश्चिम बंगाल व तामिळनाडूत फारशी चांगली कामगिरी बजावू न शकल्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेर्पयत कठोर मेहनत करेल, अशी ग्वाही गुरुवारी दिली. राहुल गांधी टि¦टरवर म्हणाले, आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणो स्वीकारतो आणि निवडणुकीत विजयी  पक्षांना शुभेच्छा देतो. 
 
(वृत्तसंस्था)