शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नाणारवासीयांच्या संघर्षाला राहुल गांधींचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 05:37 IST

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शनिवारी पाठिंबा व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शनिवारी पाठिंबा व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त करत प्रकल्पाकरिता सुपीक व चांगले उत्पन्न देणाºया जमिनी का घेतल्या जात आहेत?, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. प्रकल्पाविरोधातील संघर्षाबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना अवगत केले. सायंकाळी अर्धा तास झालेल्या बैठकीत गांधी यांनी प्रकल्पाला होणाºया विरोधाची आणि कारणांची माहिती घेतली.प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी संबंधित गावांत आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू इत्यादींची सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भाग येतो, असे सांगितले.प्रकल्पामुळे ५० हजार लोक विस्थापित होणार असून मच्छीमारांसह बागायतदारांचे नुकसान होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.शिवसेना व भाजपा आम्हाला फसवत असून राज्य सरकार जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी तत्काळ अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे-पाटील यांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. त्यानुसार खा. अशोक चव्हाण २ मे रोजी नाणार येथे जाणार असून ते स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.नवी दिल्ली येथे शनिवारी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना नाणार प्रकल्पाविरोधातील संघर्षाबद्दल कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व सदस्यांनी माहिती दिली. सोबत डावीकडून खा. अशोक चव्हाण, आ. भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्पRahul Gandhiराहुल गांधी