शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नाणारवासीयांच्या संघर्षाला राहुल गांधींचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 05:37 IST

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शनिवारी पाठिंबा व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शनिवारी पाठिंबा व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त करत प्रकल्पाकरिता सुपीक व चांगले उत्पन्न देणाºया जमिनी का घेतल्या जात आहेत?, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. प्रकल्पाविरोधातील संघर्षाबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना अवगत केले. सायंकाळी अर्धा तास झालेल्या बैठकीत गांधी यांनी प्रकल्पाला होणाºया विरोधाची आणि कारणांची माहिती घेतली.प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी संबंधित गावांत आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू इत्यादींची सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भाग येतो, असे सांगितले.प्रकल्पामुळे ५० हजार लोक विस्थापित होणार असून मच्छीमारांसह बागायतदारांचे नुकसान होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.शिवसेना व भाजपा आम्हाला फसवत असून राज्य सरकार जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी तत्काळ अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे-पाटील यांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. त्यानुसार खा. अशोक चव्हाण २ मे रोजी नाणार येथे जाणार असून ते स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.नवी दिल्ली येथे शनिवारी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना नाणार प्रकल्पाविरोधातील संघर्षाबद्दल कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व सदस्यांनी माहिती दिली. सोबत डावीकडून खा. अशोक चव्हाण, आ. भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्पRahul Gandhiराहुल गांधी