शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

काँग्रेसचे भवितव्य राहुल गांधींच्या हाती

By admin | Updated: October 22, 2014 05:42 IST

महाराष्ट्र आणि हरियाणातील पराभवाबद्दल राहुल गांधी यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागली असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशाआकांक्षा गांधी कुटुंबावरच टिकून आहेत

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणातील पराभवाबद्दल राहुल गांधी यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागली असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशाआकांक्षा गांधी कुटुंबावरच टिकून आहेत. कोट्यवधी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर सामूहिक विश्वास दाखविला आहे, असे पक्षप्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.काहींनी वैयक्तिकरीत्या शंका व्यक्त केली असली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्या क्षमतेविषयी नि:संशय विश्वास आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच काँग्रेसला भवितव्य असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते. आपण कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली. दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवासारख्या घडामोडी लोकशाही प्रक्रियेचा भाग आहेत. विजय आणि पराभव हा लोकशाहीचा भाग आहे. विजयाचा उन्माद नको पराभवाने खचून जाऊ नये, हेच पक्षाचे धोरण राहिले असे सांगत त्यांनी महाराष्ट्र, हरियाणाच्या पराभवाच्या कारणांना महत्त्व देण्याचे टाळले. काँग्रेसने हरियाणात चांगली लढत दिली आहे. या राज्यात कोणत्याही पक्षाला दोन पेक्षा जास्त टर्म सत्ता मिळालेली नाही. आम्ही सातत्याने दोनदा जनादेश मिळविले आहे. निवडणूक निकालाबाबत आत्मपरीक्षण करीत आवश्यकता भासणाऱ्या नव्या घटकांपर्यंत पोहोचण्याबाबत विचार केला जाईल,असे त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)