शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राहुल गांधीमुळेच काँग्रेसचा पराभव - काँग्रेस नेत्याची टीका

By admin | Updated: May 29, 2014 14:28 IST

केरळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.

ऑनलाइन टीम

कोच्ची, दि. २८ - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमधून उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर थेट टीका होऊ लागली आहे. केरळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देत नसतील तर त्यांना हटवले पाहिजे, अशा शब्दांत माजी मंत्री टी. एच. मुस्तफा यांनी राहुल यांना लक्ष्य केले आहे. तसेच प्रियांका गांधी यांच्या हातात काँग्रेसची कमान सोपवावी, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 
या निवडणुकीत काँग्रेसला अतिशय दारूण पराभव स्वीकारावा लागल्याने सर्व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे.  या पराभवासाठी राहुल गांधीच जबाबादार असल्याचे मत पक्षातून व्यक्त होत होते. मात्र केरळमधील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री टी. एच. मुस्तफा यांनी या मुद्यावर स्पष्टपणे मत मांडत राहुल यांच्यावर कठोर टीका केली. निवडणूकीच्या काळात ते (राहुल) कॉम्प्युटर, इंटरनेट व काँग्रेस कार्यकारिणीच्या काही खास सदस्यांच्या गटांमध्येच अडकून राहिले होते, त्यामुळे पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच या पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि जर ते पदांचा राजीनामा देत नसतील, तर त्यांना हटवून पक्षाची धुरा प्रियांका गांधी यांच्या हातात दिली पाहीजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.