शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

सरकारच्या अपयशाकडे राहुल गांधी यांचे लक्ष

By admin | Updated: May 25, 2016 01:00 IST

सत्ता गेली असली तरी आपला जनाधार भक्कम आणि मोठा आहे, हा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाचा दावा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरलेला दिसत

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

सत्ता गेली असली तरी आपला जनाधार भक्कम आणि मोठा आहे, हा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाचा दावा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरलेला दिसत नाही. काँग्रेसचा हा तर्क पक्षाचे वरिष्ठ नेते खोडून काढताना दिसत आहेत. अशाप्रकारचा तर्क देणारे काँग्रेस नेते अखेर कोणत्या भ्रमात कायम राहू इच्छितात? हे नेते आपले पद सुरक्षित राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची ‘चापलुसी’ तर करीत नाहीत ना? आम्ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, अशी टिप्पणी काँग्रेसच्या एका माजी सरचिटणीसाने खासगीत केली. सध्या पक्षश्रेष्ठी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पक्ष मुख्यालयात बसलेल्या नेत्यांना हटवून त्यांच्या जागी नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने पक्षातील एकमेकांविरुद्धचा संघर्ष तीव्र झाला आहे.दरम्यान उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी काही नेत्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्यासोबत चर्चा करून दिल्लीतील पाणी आणि विजेच्या प्रश्नावर २८ मे रोजी महारॅली आयोजित करण्याचे ठरविले आहे. या रॅलीनंतर लगेच लोकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी महागाईच्या मुद्यावरून देशभरात आंदोलन छेडण्याची काँग्रेसची तयारी आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकड्यांचा खेळ मांडून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष भाजपापेक्षा पुढेच राहिलेला आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्या पचनी पडलेला नाही. परंतु त्यांनी अद्याप आपली याबाबतची नापसंती जाहीर केलेली नाही. तथापि याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात यावा, असे निर्देश मात्र त्यांनी दिलेले आहेत. तसेच मोदी सरकारचे दोन वर्षांतील अपयाबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे निर्देशही राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना दिले आहेत. मोदी सरकारच्या या अपयशाची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी देशभरात जिल्हा आणि राज्यस्तरावर आंदोलन छेडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.अपयशाचा लेखाजोखामोदी सरकारचे दोन वर्षांतील अपयश व खराब कामगिरीवर लक्ष केंद्रित करून त्याबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना दिले आहेत. आश्वासने पाळण्यात व देशाचा विकास करण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशाचा लेखाजोखा काँग्रेसतर्फे जारी केला जाईल.