शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

सरकारच्या अपयशाकडे राहुल गांधी यांचे लक्ष

By admin | Updated: May 25, 2016 01:00 IST

सत्ता गेली असली तरी आपला जनाधार भक्कम आणि मोठा आहे, हा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाचा दावा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरलेला दिसत

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

सत्ता गेली असली तरी आपला जनाधार भक्कम आणि मोठा आहे, हा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाचा दावा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरलेला दिसत नाही. काँग्रेसचा हा तर्क पक्षाचे वरिष्ठ नेते खोडून काढताना दिसत आहेत. अशाप्रकारचा तर्क देणारे काँग्रेस नेते अखेर कोणत्या भ्रमात कायम राहू इच्छितात? हे नेते आपले पद सुरक्षित राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची ‘चापलुसी’ तर करीत नाहीत ना? आम्ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, अशी टिप्पणी काँग्रेसच्या एका माजी सरचिटणीसाने खासगीत केली. सध्या पक्षश्रेष्ठी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पक्ष मुख्यालयात बसलेल्या नेत्यांना हटवून त्यांच्या जागी नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने पक्षातील एकमेकांविरुद्धचा संघर्ष तीव्र झाला आहे.दरम्यान उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी काही नेत्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्यासोबत चर्चा करून दिल्लीतील पाणी आणि विजेच्या प्रश्नावर २८ मे रोजी महारॅली आयोजित करण्याचे ठरविले आहे. या रॅलीनंतर लगेच लोकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी महागाईच्या मुद्यावरून देशभरात आंदोलन छेडण्याची काँग्रेसची तयारी आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकड्यांचा खेळ मांडून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष भाजपापेक्षा पुढेच राहिलेला आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्या पचनी पडलेला नाही. परंतु त्यांनी अद्याप आपली याबाबतची नापसंती जाहीर केलेली नाही. तथापि याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात यावा, असे निर्देश मात्र त्यांनी दिलेले आहेत. तसेच मोदी सरकारचे दोन वर्षांतील अपयाबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे निर्देशही राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना दिले आहेत. मोदी सरकारच्या या अपयशाची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी देशभरात जिल्हा आणि राज्यस्तरावर आंदोलन छेडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.अपयशाचा लेखाजोखामोदी सरकारचे दोन वर्षांतील अपयश व खराब कामगिरीवर लक्ष केंद्रित करून त्याबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना दिले आहेत. आश्वासने पाळण्यात व देशाचा विकास करण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशाचा लेखाजोखा काँग्रेसतर्फे जारी केला जाईल.