शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

By admin | Published: March 03, 2016 5:05 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनांचे मायाजाल तयार करून निवडणुका जिंकून दाखवल्या खऱ्या, पण आता या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्णयांबद्दल जनता सवाल निर्माण करू लागली आहे

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनांचे मायाजाल तयार करून निवडणुका जिंकून दाखवल्या खऱ्या, पण आता या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्णयांबद्दल जनता सवाल निर्माण करू लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी काळा पैसा पांढरा करण्याची जी योजना सादर केली, त्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, ही मोदींची फेअर अ‍ॅण्ड लवली योजना आहे. काळा पैसा असलेल्यांना तुरुंगात पाठवू, असे मोदी सांगतात. पण फेअर अ‍ॅण्ड लवली योजनेद्वारे त्यांनी काळ्या पैसेवाल्यांना सुटकेचा मार्गही दाखवला आहे, अशी टीका करून ते म्हणाले की, आम्ही सत्तेत येताच सारे काही स्वस्त करू, असे आश्वासन मोदी देत होते. पण यूपीए सत्तेत असताना ७0 रुपये किलो असलेली तूरडाळ आज २00 रुपयांवर गेली आहे. याला आश्वासनपूर्ती म्हणायचे की काय, असा सवाल करत, दोन वर्षांत तुमच्या सरकारने किती जणांना रोजगार मिळवून दिला, याचा जाब द्या, असे आव्हानच पंतप्रधानांना दिले. आमच्याकडे महात्मा गांधी आहेत, तुमच्याकडे सावरकर आहेत, आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, तर तुम्ही हिंसेवर, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढताच भाजप सदस्यांनी उभे राहून गोंधळ सुरू केला. शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार अशा सर्वांवर हल्ले होत असताना पंतप्रधान गप्प बसून राहल्याबद्दलही गांधी यांनी आक्षेप घेतला. मोदी आजतागायत गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान म्हणजे देश आणि देश म्हणजे पंतप्रधान असे कोणी समजू नये, असा टोला लगावून राहुल गांधी म्हणाले की राष्ट्रवाद आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आम्ही तिरंग्याला सलाम करतो, तेव्हा त्या कापडाला नव्हे, तर राष्ट्राला, राष्ट्रीय विचारांनाच सलाम करतो. जनता आणि राष्ट्र यांच्यात असलेले नात्यावर शंका घेउ नका, असेही ते म्हणाले.पाकिस्तानातील शासकांनी आपल्या राष्ट्रध्वजाला सलाम करण्याचे नाटक केले. पण त्या शासकांचे जनतेशी असलेले नाते तुटून गेले. त्यामुळे आज आपण पाकिस्तान आणि बांगला देश असे दोन देश झाल्याचे पाहत आहोत. जनेतचे एकमेकांशी असलेले नाते जात, भाषा, प्रांत, धर्म अशा मुद्द्यांवर न तोडण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले. अर्थात तसे आम्ही होउच देणार नाही, असा दावा करताना ते म्हणाले की, यूपीए सरकारने पाकिस्तानची कंबर ६ वर्षांत मोडून दाखवली होती. जगापासून पाकिस्तानला आम्ही व एकटे पाडले होते. पण मोदी मात्र ठरले नसतानाही चहा प्यायला पाकिस्तानात गेले. परिणाम काय, तर पठाणकोटमध्ये हल्ला झाला. यूपीएने सहा वर्षांत जे करून दाखवले ते मोदी यांच्या पाक भेटीमुळे बिघडून गेले, अशी जळजळीत टीकाही राहुल गांधी यांनी केली.