शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राहुल गांधींना हवी ममतांशी युती

By admin | Updated: November 30, 2015 02:44 IST

बिहारमधील महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प. बंगालमध्ये भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारमधील महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प. बंगालमध्ये भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी ममतांशी थेट संपर्क साधत युतीची शक्यता पडताळली आहे.राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी आपापल्या विशेष विमानाने अनुक्रमे दिल्ली आणि कोलकात्याला परतत असताना पाटणा विमानतळावरच त्यांच्यात अनौपचारिक चर्चेची पहिली फेरी पार पडली. हे दोघेही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी एकत्र आले असतानाचा हा प्रसंग आहे. स्वत: राहुल गांधी ममता बॅनर्जी यांच्याकडे गेले. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. नेमके कोणत्या  मुद्यावर बोलणे झाले ते कळू शकले नाही.शपथविधी कार्यक्रमाच्यावेळी हे दोघे व्यासपीठावर एकत्र आले मात्र त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व देण्यात आले नव्हते. प. बंगालमध्ये ५५ ते ६५ जागा लढण्यावर काँग्रेस समाधान मानेल. २९४ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे ४० आमदार असून २०११ च्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष २५ जागांवर दुसऱ्या स्थानी राहिला होता.ममतांनाही आश्चर्याचा धक्का....तृणमूल काँग्रेसला अधिक जागा देण्याची तयारीही राहुल गांधी यांनी दर्शविल्यामुळे ममता बॅनर्जी यांना आश्चर्याचा धक्का बसला. पक्षांतर्गत व्यासपीठावर चर्चा केल्यानंतर या विषयावर पुन्हा बोलण्याचे आश्वासन ममतांनी यावेळी राहुल गांधी यांना दिल्याचे समजते. त्या दिल्लीत ७ डिसेंबर रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कन्येच्या विवाहाला उपस्थित राहणार असून प. बंगालमधील विविध प्रकल्पांसाठी पैसा खेचून आणण्यासाठी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठीचाही त्यांचा उद्देश असेल. मोदी सरकारला लोकसभेत ३३ तर राज्यसभेत ११ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.येचुरींशी हातमिळवणी नाही !राहुल गांधी यांचे सीताराम येचुरी यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध आहेत, मात्र काँग्रेस येचुरी यांच्या माकपशी युती करण्याची शक्यता नाही. केरळमध्ये मे २०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुका माकप आणि काँग्रेस परस्परांविरुद्ध लढणार आहेत. ते पाहता या दोहोंमध्ये प. बंगालमध्ये युती होणार नाही. राहुल गांधी यांनी एकतर्फी ममता बॅनर्जींकडे युतीचा हात समोर करण्यात मोठे डावपेच मानले जातात. संसदेत आणि बाहेर त्यांनी भाजपला साथ देऊ नये, हा उद्देशही त्यामागे आहे. काँग्रेसचा ढासळता आधार पाहता राहुल गांधी यांना ममतांची मदत हवी आहे.