शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

राहुल गांधींना हवी ममतांशी युती

By admin | Updated: November 30, 2015 02:44 IST

बिहारमधील महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प. बंगालमध्ये भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारमधील महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प. बंगालमध्ये भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी ममतांशी थेट संपर्क साधत युतीची शक्यता पडताळली आहे.राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी आपापल्या विशेष विमानाने अनुक्रमे दिल्ली आणि कोलकात्याला परतत असताना पाटणा विमानतळावरच त्यांच्यात अनौपचारिक चर्चेची पहिली फेरी पार पडली. हे दोघेही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी एकत्र आले असतानाचा हा प्रसंग आहे. स्वत: राहुल गांधी ममता बॅनर्जी यांच्याकडे गेले. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. नेमके कोणत्या  मुद्यावर बोलणे झाले ते कळू शकले नाही.शपथविधी कार्यक्रमाच्यावेळी हे दोघे व्यासपीठावर एकत्र आले मात्र त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व देण्यात आले नव्हते. प. बंगालमध्ये ५५ ते ६५ जागा लढण्यावर काँग्रेस समाधान मानेल. २९४ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे ४० आमदार असून २०११ च्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष २५ जागांवर दुसऱ्या स्थानी राहिला होता.ममतांनाही आश्चर्याचा धक्का....तृणमूल काँग्रेसला अधिक जागा देण्याची तयारीही राहुल गांधी यांनी दर्शविल्यामुळे ममता बॅनर्जी यांना आश्चर्याचा धक्का बसला. पक्षांतर्गत व्यासपीठावर चर्चा केल्यानंतर या विषयावर पुन्हा बोलण्याचे आश्वासन ममतांनी यावेळी राहुल गांधी यांना दिल्याचे समजते. त्या दिल्लीत ७ डिसेंबर रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कन्येच्या विवाहाला उपस्थित राहणार असून प. बंगालमधील विविध प्रकल्पांसाठी पैसा खेचून आणण्यासाठी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठीचाही त्यांचा उद्देश असेल. मोदी सरकारला लोकसभेत ३३ तर राज्यसभेत ११ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.येचुरींशी हातमिळवणी नाही !राहुल गांधी यांचे सीताराम येचुरी यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध आहेत, मात्र काँग्रेस येचुरी यांच्या माकपशी युती करण्याची शक्यता नाही. केरळमध्ये मे २०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुका माकप आणि काँग्रेस परस्परांविरुद्ध लढणार आहेत. ते पाहता या दोहोंमध्ये प. बंगालमध्ये युती होणार नाही. राहुल गांधी यांनी एकतर्फी ममता बॅनर्जींकडे युतीचा हात समोर करण्यात मोठे डावपेच मानले जातात. संसदेत आणि बाहेर त्यांनी भाजपला साथ देऊ नये, हा उद्देशही त्यामागे आहे. काँग्रेसचा ढासळता आधार पाहता राहुल गांधी यांना ममतांची मदत हवी आहे.