शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 15:15 IST

नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. 

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधींनी  आता बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 9 ऑगस्ट रोजी युवा कॉंग्रेस स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले, 'नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील तरुणांना वचन दिले होते की, 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून मिळेल. प्रत्येक वर्षी एक मोठे स्वप्न दाखवले. पण अखेर सत्य बाहेर आलेच. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी म्हणतात, हे का झालं, तर चुकीच्या धोरणांमुळेच झाले. नोटाबंदी, चुकीचा जीएसटी आणि नंतर लॉकडाऊन केलं. या तिन्ही घटकांनी भारताची रचना, आर्थिक संरचना नष्ट केली. आता सत्य हे आहे की, भारत यापुढे मोदी सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. म्हणूनच युवक कॉंग्रेस मैदानात उतरत आहे.राहुल गांधी म्हणाले की, युवक कॉंग्रेस प्रत्येक शहरात, प्रत्येक रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित करणार आहे, याचा मला आनंद आहे. युवक कॉंग्रेस बेरोजगारीचा मुद्दा लावून धरणार आहे. राहुल गांधींनी लोकांना आवाहन केले आहे की, तुम्ही सर्वांनी 'रोजगार दो' मोहिमेमध्ये सामील व्हा आणि देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युवक कॉंग्रेसबरोबर काम करावे.आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छातत्पूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट केले होते की, 'आदिवासी समाजातील जीवनशैलीत निसर्गावर विश्वास, प्रेम आणि आदर आहे, जेणेकरून संपूर्ण जग संरक्षण आणि एकत्र राहण्यास शिकेल. आपल्या सर्वांनी एकत्रितपणे या सांस्कृतिक वारशाची जपणूक केली पाहिजे. जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी