शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 17:48 IST

Rahul Gandhi trolls PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत या संदर्भात वक्तव्य केले होते

Rahul Gandhi trolls PM Narendra Modi: केरळच्या वायनाडमधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदाच तेथे पोहोचले. तिथे ते म्हणाले की, वायनाड आणि रायबरेलीची जागा जिंकल्यानंतर आता कोणत्या मतदारसंघातून खासदारकी कायम ठेवायची आणि कोणत्या जागेवरून सोडायची या संभ्रमात राहुल गांधी आहेत. वायनाडच्या जनतेचे आभार व्यक्त करताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

मलप्पुरममधील एका जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले, "मी जो काही निर्णय घेईन त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील जनतेला आनंद होईल असा मला विश्वास आहे. मला आशा आहे की लवकरच आपली भेट होईल. मी वायनाडचा खासदार राहायचे की रायबरेलीचे, या संभ्रमात आहे. पण मला कुठलेही इश्वरी संकेत मिळत नाहीत. पंतप्रधानांना मात्र तसे काहीसे करता येते. देवानेच पंतप्रधानांना देशातील प्रमुख विमानतळे आणि वीज प्रकल्प अदानींकडे सोपवण्याचे निर्देश दिले," असा टोमणा राहुल गांधींनी मारला.

"मी माणूस आहे. माझा देव देशाची गरीब जनता आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे सोपे आहे. मी फक्त लोकांशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो आणि ते मला सांगतात की मी काय केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीचा लढा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी होता आणि त्या लढ्यात द्वेषाचा प्रेमाने, अहंकाराचा नम्रतेने पराभव झाल्याचे दिसले. भारतातील जनतेने स्पष्ट संदेश दिल्याने आता तरी पंतप्रधान मोदींना आपला दृष्टिकोन बदलावा. नवे सरकार हे दुसऱ्याच्या आधारावर चालत असलेले 'पंगू सरकार' आहे," अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

दरम्यान, केपीसीसी प्रमुख के. सुधाकरन यांनी राहुल गांधींना वायनाड लोकसभा जागा सोडण्याचे संकेत दिले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीwayanad-pcवायनाडrae-bareli-pcरायबरेली