शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

RSS ने सत्तेत येण्याआधी कधीच तिरंग्याला वंदन केलं नाही - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 14:47 IST

'भाजपा 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा स्विकारच केला नव्हता'

नवी दिल्ली, दि. 17 - भाजपा 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा स्विकारच केला नव्हता. देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. 'जोपर्यंत सत्ता आली नाही तोपर्यंत त्यांनी कधीच तिरंग्याला सलाम केला नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. जेडीयू नेते शरद यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

आणखी वाचापंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी

राहुल गांधी बोलले आहेत की, 'देशाकडे पाहण्याचे दोन प्रकार असतात. एक प्रकार सांगतो देश माझा आहे, तर दुसरा म्हणतो मी देशाचा आहे. आरएसएस आणि आमच्यात हाच फरक आहे. आरएसएस म्हणतं देश आमचा आहे, पण तुम्ही या देशाचे नाहीत. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करण्यात आली, आणि तुम्ही या देशाचे नाहीत असं सांगण्यात आलं'. 

'आपल्या विचारधारेच्या आधारावर निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही हे आरएसएसला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांना भर्ती केलं जात आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'संविधान सांगतं एक व्यक्ती, एक मत. पण आरएसएस संविधान बदलू पाहत आहे', असंही राहुल गांधी बोलले आहेत. 

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही टीका केली. 'अरुण जेटली लोकसभेत सांगतात की, कर्ज माफ करणं आमची पॉलिसी नाही. शेतक-याचा मृत्यू झाला तरी यांना काही फरक पडत नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. नरेंद्र मोदींचं मेक इन इंडिया फेल झाल्याचा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'मोदींनी मेक इन इंडिया दिलं, पण अनेक गोष्टी मेड इन चायना आहेत. मोदींचं मेक इन इंडिया फेल झालं हे सत्य आहे', असं राहुल गांधींनी सांगितलं. 

'नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे काही ना काहीतरी खोटं बोलत असतात. जर आपण एकत्र येऊन लढलो तर हे दिसणारी नाहीत', असं राहुल गांधी बोलले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी