शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

RSS ने सत्तेत येण्याआधी कधीच तिरंग्याला वंदन केलं नाही - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 14:47 IST

'भाजपा 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा स्विकारच केला नव्हता'

नवी दिल्ली, दि. 17 - भाजपा 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा स्विकारच केला नव्हता. देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. 'जोपर्यंत सत्ता आली नाही तोपर्यंत त्यांनी कधीच तिरंग्याला सलाम केला नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. जेडीयू नेते शरद यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

आणखी वाचापंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी

राहुल गांधी बोलले आहेत की, 'देशाकडे पाहण्याचे दोन प्रकार असतात. एक प्रकार सांगतो देश माझा आहे, तर दुसरा म्हणतो मी देशाचा आहे. आरएसएस आणि आमच्यात हाच फरक आहे. आरएसएस म्हणतं देश आमचा आहे, पण तुम्ही या देशाचे नाहीत. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करण्यात आली, आणि तुम्ही या देशाचे नाहीत असं सांगण्यात आलं'. 

'आपल्या विचारधारेच्या आधारावर निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही हे आरएसएसला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांना भर्ती केलं जात आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'संविधान सांगतं एक व्यक्ती, एक मत. पण आरएसएस संविधान बदलू पाहत आहे', असंही राहुल गांधी बोलले आहेत. 

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही टीका केली. 'अरुण जेटली लोकसभेत सांगतात की, कर्ज माफ करणं आमची पॉलिसी नाही. शेतक-याचा मृत्यू झाला तरी यांना काही फरक पडत नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. नरेंद्र मोदींचं मेक इन इंडिया फेल झाल्याचा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'मोदींनी मेक इन इंडिया दिलं, पण अनेक गोष्टी मेड इन चायना आहेत. मोदींचं मेक इन इंडिया फेल झालं हे सत्य आहे', असं राहुल गांधींनी सांगितलं. 

'नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे काही ना काहीतरी खोटं बोलत असतात. जर आपण एकत्र येऊन लढलो तर हे दिसणारी नाहीत', असं राहुल गांधी बोलले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी