शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

RSS ने सत्तेत येण्याआधी कधीच तिरंग्याला वंदन केलं नाही - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 14:47 IST

'भाजपा 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा स्विकारच केला नव्हता'

नवी दिल्ली, दि. 17 - भाजपा 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा स्विकारच केला नव्हता. देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. 'जोपर्यंत सत्ता आली नाही तोपर्यंत त्यांनी कधीच तिरंग्याला सलाम केला नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. जेडीयू नेते शरद यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

आणखी वाचापंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी

राहुल गांधी बोलले आहेत की, 'देशाकडे पाहण्याचे दोन प्रकार असतात. एक प्रकार सांगतो देश माझा आहे, तर दुसरा म्हणतो मी देशाचा आहे. आरएसएस आणि आमच्यात हाच फरक आहे. आरएसएस म्हणतं देश आमचा आहे, पण तुम्ही या देशाचे नाहीत. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करण्यात आली, आणि तुम्ही या देशाचे नाहीत असं सांगण्यात आलं'. 

'आपल्या विचारधारेच्या आधारावर निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही हे आरएसएसला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांना भर्ती केलं जात आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'संविधान सांगतं एक व्यक्ती, एक मत. पण आरएसएस संविधान बदलू पाहत आहे', असंही राहुल गांधी बोलले आहेत. 

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही टीका केली. 'अरुण जेटली लोकसभेत सांगतात की, कर्ज माफ करणं आमची पॉलिसी नाही. शेतक-याचा मृत्यू झाला तरी यांना काही फरक पडत नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. नरेंद्र मोदींचं मेक इन इंडिया फेल झाल्याचा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'मोदींनी मेक इन इंडिया दिलं, पण अनेक गोष्टी मेड इन चायना आहेत. मोदींचं मेक इन इंडिया फेल झालं हे सत्य आहे', असं राहुल गांधींनी सांगितलं. 

'नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे काही ना काहीतरी खोटं बोलत असतात. जर आपण एकत्र येऊन लढलो तर हे दिसणारी नाहीत', असं राहुल गांधी बोलले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी