शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राहुल गांधी यांची अध्यक्ष होण्यास ना नाही

By admin | Updated: September 21, 2016 07:38 IST

माझ्या बहिणीवर माझा सर्वाधिक विश्‍वास आहे. तिने राजकारणात यावे, असे मला मनापासून वाटते;

हमीरपूर : माझ्या बहिणीवर माझा सर्वाधिक विश्‍वास आहे. तिने राजकारणात यावे, असे मला मनापासून वाटते; परंतु तो निर्णय तिलाच घ्यायचा आहे, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे मांडले. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसच्या लागोपाठ पराभवांमुळे प्रियांका यांनी राजकारणात उतरावे यासाठी दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांना छेडले असता हा निर्णय सर्वस्वी प्रियांकाला घ्यायचा असल्याचे त्यांनी म्हटले. हैदराबाद : काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास राहुल गांधी यांची ना नाही, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी मंगळवारी येथे सांगितले. प्रियांका गांधी यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी सक्रिय राजकारणात उतरावे, असे बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. तथापि, त्यांना तसे करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.पक्षाचे प्रमुखपद स्वीकारण्यास त्यांची (राहुल) ना नाही. ते कधी स्वीकारायचे एवढाच काय तो मुद्दा आहे. त्यांना त्यांची वेळ ठरवू द्यावी. राजकारणात वेळ-काळ खूप महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे नेतृत्वाला आपली वेळ ठरवू द्या, असे ते म्हणाले. प्रियांका गांधींबाबत बोलायचे झाल्यास त्या आतापर्यंत राजकारणात नाहीत. त्यांना राजकारणात येण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. हा त्यांचा स्वत:चा निर्णय असून आम्ही त्याचा आदर करायला हवा. त्यांनी राजकारणात उतरावे, अशी बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना असून, त्यात गैर काही नाही; परंतु राजकारणात कधी यायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, आपण नाही ठरवू शकत, असेही त्यांनी नमूद केले.यावर्षीच्या प्रारंभी चार राज्यांत पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी काँग्रेसला मोठय़ा शस्त्रक्रियेची गरज असल्याचे विधान केले होते. त्याबाबत छेडले असता दिग्विजयसिंह म्हणाले की, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा राज्यांत पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. आपले विधान योग्य होते. तथापि, नंतर काँग्रेस अध्यक्षा आजारी पडल्या. बदल होतील यात शंका नाही. हे बदल कधी करायचे याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना घ्यायचा आहे. पक्ष संघटनेत दीर्घकाळापासून बदल झालेले नाहीत. बदल व्हावेत, असे प्रत्येकाला वाटते. याबाबत काँग्रेस अध्यक्षांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला वाटते त्या गतीने पक्षात बदल होत नसल्यामुळे तुम्ही निराश आहात काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, राजकारणात निराशा नसते. प्रत्येकाला कठीण परिस्थितीत जगण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते. राजकारणात जसा चांगला काळ असतो, तसा वाईट काळही असतो. त्यामुळे आम्ही प्रतिकूलतेला संधीत रूपांतरित केले पाहिजे, असेही त्यांनी बोलून दाखवले. (वृत्तसंस्था)