शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

राहुल गांधी यांच्या जागी तरुण नेतृत्वाला संधी द्यावी - अमरिंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 04:46 IST

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पुरोगामी दृष्टिकोन असलेला तरुण नेताच पक्ष कार्यकर्त्यांत जोश निर्माण करू शकेल.

- शीलेश शर्मा 

चंदीगड : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदावर केवळ प्रभावशाली तरुण नेतृत्वालाच संधी द्यायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केले.

अमरिंदरसिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पुरोगामी दृष्टिकोन असलेला तरुण नेताच पक्ष कार्यकर्त्यांत जोश निर्माण करू शकेल. अखिल भारतीय पातळीवर आवाहन क्षमता असलेला, तसेच तळागाळापर्यंत अस्तित्व असलेल्या करिश्माई तरुण नेत्यालाच राहुल गांधी यांच्या जागी स्थान द्यायला हवे.

अमरिंदरसिंग यांनी म्हटले की, तरुण नेतृत्वाने पक्षाची धुरा हाती घेऊन पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा मार्ग राहुल गांधी यांनी दाखवून दिला आहे. तरुण लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगाचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे लोकभावना समजून घेणे आणि तिच्याशी समरूप होणे हे तरुण नेतृत्वाला प्रभावीपणे साध्य होणे हे नैसर्गिकच आहे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. पक्ष नेतृत्वात बदल करताना भारतीय समाजाचे हे वास्तव त्यात प्रतिबिंबित व्हायलाच हवे.

सिंग यांनी म्हटले की, राजीनाम्यावर ठाम राहण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय पक्षासाठी निश्चितच निराशाजनक आणि धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्याच तरुण आणि प्रभावशाली नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्ष या धक्क्यातून सावरू शकतो. सर्वांत जुन्या पक्षाला तरुण नेताच पुनरुज्जीवित करू शकतो. राहुल गांधी यांनी पक्षात भरलेली ऊर्जा काँग्रेस नेत्यांनी कायम ठेवायला हवी. पक्षाला पुन्हा एकमेव पर्यायाच्या स्थितीत नेण्यासाठी एका तरुण नेतृत्वाची गरज आहे. अमरिंदर सिंग यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदी अशा तरुण नेत्याची निवड व्हायला हवी, जो भारतातील बहुसंख्य लोकांशी समरूप होऊ शकेल, जो पक्षाला नव्या विचाराचा डोस देऊ शकेल, जो देशाला सत्ताधारी भाजपच्या प्रतिगामी आणि विध्वंसक धोरणांपासून वाचवू शकेल.हालचाली गतिमानदरम्यान, नवीन अध्यक्ष निवडण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये गतिमान झाल्या आहेत. नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी होणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीस राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या उपस्थित राहणार नसल्याचे समजते.राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, पक्षाचे ज्येष्ठ सरचिटणीस या नात्याने मुकुल वासनिक अध्यक्षपदासाठी दावा सादर करीत आहेत. अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास ज्येष्ठ सरचिटणीसाकडे अध्यक्षपद सोपविण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.काँग्रेस पक्षातील अधिकांश नेते मात्र अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाला अधिक पसंती देत आहेत. त्यातही गेहलोत आणि खडगे हे स्पर्धेत पुढे आहेत.