शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मानहानी प्रकरणी राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा, १५ हजारांचा दंड, उच्च न्यायालयात जाण्यासाठी शिक्षा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:09 IST

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.

सुरत : ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते...’ या २०१९ मध्ये केलेल्या विधानाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधींना दोषी ठरवले. या निर्णयाच्या २७ मिनिटांनंतर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंडही ठोठावला. काही काळानंतर त्याच न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच, शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. सुनावणीदरम्यान राहुल गांधी न्यायालयात हजर होते.

न्यायाधीशांनी राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि विचारले की, काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल गांधी यांचे वकील बाबू मांगुकिया म्हणाले की, राहुल गांधी भ्रष्टाचाराविरोधात बोलले; पण जाणूनबुजून काहीही बोलले नाही. त्यांच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान झालेले नाही, त्यामुळे किमान शिक्षा व्हावी. दुसरीकडे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, राहुल गांधी हे खासदार आहेत, जे कायदा करतात. त्यांनीच तो मोडला तर समाजात काय संदेश जाईल, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. राहुल गांधी यांचे वकील न्यायालयात म्हणाले, आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राहुल गांधींकडे ३० दिवसांचा अवधी आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे प्रकरण? २०१९च्या निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ मग तो ललित मोदी असो की नीरव मोदी असो की नरेंद्र मोदी’, असे म्हटले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.

निर्णयाला आव्हान दिल्यास खासदारकी राहणारजुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ज्या लोकप्रतिनिधींना (आमदार-खासदार) न्यायालयात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली आहे, त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्यांना सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते.

दयायाचना नाहीराहुल यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही. म्हणूनच आम्ही दया मागत नाही.

सत्य हाच माझा देव आहे...शिक्षा जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचे वचन ट्वीट केले. ‘माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे, अहिंसा ते मिळवण्याचे साधन - महात्मा गांधी’, असे ट्वीट त्यांनी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणGujaratगुजरात