शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मानहानी प्रकरणी राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा, १५ हजारांचा दंड, उच्च न्यायालयात जाण्यासाठी शिक्षा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:09 IST

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.

सुरत : ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते...’ या २०१९ मध्ये केलेल्या विधानाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधींना दोषी ठरवले. या निर्णयाच्या २७ मिनिटांनंतर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंडही ठोठावला. काही काळानंतर त्याच न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच, शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. सुनावणीदरम्यान राहुल गांधी न्यायालयात हजर होते.

न्यायाधीशांनी राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि विचारले की, काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल गांधी यांचे वकील बाबू मांगुकिया म्हणाले की, राहुल गांधी भ्रष्टाचाराविरोधात बोलले; पण जाणूनबुजून काहीही बोलले नाही. त्यांच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान झालेले नाही, त्यामुळे किमान शिक्षा व्हावी. दुसरीकडे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, राहुल गांधी हे खासदार आहेत, जे कायदा करतात. त्यांनीच तो मोडला तर समाजात काय संदेश जाईल, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. राहुल गांधी यांचे वकील न्यायालयात म्हणाले, आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राहुल गांधींकडे ३० दिवसांचा अवधी आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे प्रकरण? २०१९च्या निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ मग तो ललित मोदी असो की नीरव मोदी असो की नरेंद्र मोदी’, असे म्हटले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.

निर्णयाला आव्हान दिल्यास खासदारकी राहणारजुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ज्या लोकप्रतिनिधींना (आमदार-खासदार) न्यायालयात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली आहे, त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्यांना सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते.

दयायाचना नाहीराहुल यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही. म्हणूनच आम्ही दया मागत नाही.

सत्य हाच माझा देव आहे...शिक्षा जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचे वचन ट्वीट केले. ‘माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे, अहिंसा ते मिळवण्याचे साधन - महात्मा गांधी’, असे ट्वीट त्यांनी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणGujaratगुजरात